इसिस च्या चार दहशतवाद्यांना अहमदाबाद विमानतळावरून अटक, ऐन निवडणूक काळात सुरक्षा यंत्रणांचे धाबे दणाणले

इस्लामिक स्टेटच्या (इसिस) दहशतवाद्याविराधात भारतीय संरक्षण यंत्रणांना मोठं यश मिळालं आहे. गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अहमदाबाद विमानतळावरून इसिसच्या चार दहशतवाद्याना ताब्यात घेतल आह. एटीएसन अद्याप या चाघाची माहिती जाहीर केलेली नाही.

मात्र, या कारवाईबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हे चौघेही श्रीलंकेचे नागरिक आहेत. गुजरात एटीएस याप्रकरणाची माहिती देण्यासाठी लवकरच एक पत्रकार परिषद घेणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. ह चार दहशतवादी अहमदाबादला येत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून एटीएसला मिळाली होती. या माहितीच्या आधारे एटीएस आणि इतर पोलीस कर्मचारी अहमदाबाद विमानतळावरच दबा धरून बसले होते. दहशतवादी विमानतळावर दाखल होताच एटीएसने त्यांना बेड्या ठोकल्या. एटीएसने या दहशतवाद्यांना कुठे नेलंय, दहशतवाद्यांचं अहमदाबादला येण्याचं उद्दीष्ट काय होतं? याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या दहशतवाद्यांकडून मिळालेल्या तिकीटांवरून सूत्रांनी सांगितलं की ते चेन्नईवरून अहमदाबादला आले होते. चारही दहशतवादी आधी कोलंबोवरून चेन्नई आणि मग चन्नइवरून अहमदाबादला आले होते. त्यांचे हँडलर भारतात त्यांना मार्गदर्शन करत होते. त्यामुळएटीएस आता या हँडलर्सचा शोध घेत आहे.