आमदार सुमित वानखेडे यांच्या उपस्थितीत वर्धमनेरी येथे सौर कृषी पंपाचे यशस्वी प्रात्यक्षिक

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : शेतकऱ्यांमध्ये सौरकृषी पंपाविषयी जागरूकतानिर्माण व्हावी, या उद्देशानेआर्वी विधानसभा मतदारसंघाचेआमदार समित वानखडे याच्यप्रमुख उपस्थितीत वर्धमनेरी येथे आज गुरुवार (दि. २२ मे) एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम पार पडला.जैन इरिगेशनतर्फे आयोजित याकायकमात महावितरणच्या ऽमागलत्याला सौर कृषी पंप’ योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली, तसच या पपाच शेतकऱ्यासाठीप्रत्यक्ष प्रात्यक्षिक यशस्वीरीत्यादाखवण्यात आले. वर्धमनेरी येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियाना’ प्रसंगी या माहिती आणि प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे विशेष आयोजन करण्यात आले होते. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपला आथिक स्तर उंचावावा, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना सांगण्यात आले की, सौर कृषी पंपामुळे त्यांची पारंपरिक वीज बिलातून मुक्तता होईल आणि त्यांना शाश्वत व किफायतशीर सिंचनाचा पर्याय उपलब्ध होईल.

यामुळे शेती अधिक फायदेशीर ठरणार आहे. यावेळी बोलताना आमदार सुमित वानखेडे यांनी ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच, या योजनेची माहिती आणि प्रात्यक्षिकाचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी आर्वी विभागातील इतरही ठिकाणी अशाच प्रकारचे प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या. या कार्यकमाला वर्धमनरी आणि परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी बाधव, महावितरणच अधिकारी व कर्मचारी, तसेच जैन इरिगेशनचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी जैन इरिगेशनतर्फे देण्यात आलेल्या माहितीचे आणि सौर पंपाच्या प्रात्यक्षिकाचे कौतुक केले. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि त्यांच्याकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून, हा उपक्रम यशस्वी झाल्याचे दिसून आले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत क्रांती घडवून आणण्याच्या दिशेने टाकलेले हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *