मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामात “भ्रष्टाचार’?

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : महाराष्ट्र शासनाचे ग्रामीण विकास मंत्रालयाकडून अर्थ सहाय्यीत प्रकल्पा अंतर्गत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून वर्धा जिल्ह्यात सर्वत्र रस्त्याचे विकास कामे सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वर्धा शहर लगत असलेल्याआलोडी- सेलू बॉर्डर रस्तादर्जोन्नती काम देखील याचप्रकल्पांतर्गत करण्यात येत आहे.सदर काम हे त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शन,गोंदिया नामक कंत्राटदारालादेण्यात आले आहे. परंतु या कामात मात्र निविदा नियमांना तिलांजली देत असल्याचा प्रकारआता मात्र उघडकीस आला आहे.

निविदा अटी शर्तीनुसार कंत्राटदाराजवळ 60 CumPH चा १ अथवा 30 CumPH चे 2 RMC Plant करारनामा पासून ९० दिवसांच्या आत लावणे गरजेचे असते व सदर प्लांट हा ३० किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर असल्यास रुपये १० लाख इतके FDR /TDR शासनाजवळ जमा ठेवणे अनिवार्य असते.

परंतु त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शन गोंदिया नामककंत्राटदाराचा RMC प्लांट हा करारनामापासून ९० दिवस म्हणजेच १५ जानेवारी २०२५ रोजी लावण्यात आलेलाच नसून ACM प्रमाणपत्र हे ०४ मे २०२५ रोजी देण्यात आले. तसेच या कामाकरीता शासनाकडे जमा ठेवण्यात आलेली FDR ची रक्कम देखील कंत्राटदराला परत करण्यात आली. या मागचे काडे अद्यापही उलघडलल नसून त्याचा शोध घेणे आता गरजेचे झाले आहे. सदर प्रकरणात चौकशी केली असता काही अधिकाऱ्यांचे नाव पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर या प्रकरणातला खरा “मास्टरमाईंड’ नेमका कोण? असा सवाल सर्वसाधारण जनतेच्या माध्यमातून पुढे आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *