मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामात “भ्रष्टाचार’?
निविदा अटी शर्तीनुसार कंत्राटदाराजवळ 60 CumPH चा १ अथवा 30 CumPH चे 2 RMC Plant करारनामा पासून ९० दिवसांच्या आत लावणे गरजेचे असते व सदर प्लांट हा ३० किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर असल्यास रुपये १० लाख इतके FDR /TDR शासनाजवळ जमा ठेवणे अनिवार्य असते.
परंतु त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शन गोंदिया नामककंत्राटदाराचा RMC प्लांट हा करारनामापासून ९० दिवस म्हणजेच १५ जानेवारी २०२५ रोजी लावण्यात आलेलाच नसून ACM प्रमाणपत्र हे ०४ मे २०२५ रोजी देण्यात आले. तसेच या कामाकरीता शासनाकडे जमा ठेवण्यात आलेली FDR ची रक्कम देखील कंत्राटदराला परत करण्यात आली. या मागचे काडे अद्यापही उलघडलल नसून त्याचा शोध घेणे आता गरजेचे झाले आहे. सदर प्रकरणात चौकशी केली असता काही अधिकाऱ्यांचे नाव पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर या प्रकरणातला खरा “मास्टरमाईंड’ नेमका कोण? असा सवाल सर्वसाधारण जनतेच्या माध्यमातून पुढे आला आहे.