नाला सफाईची कामे तातडीने पूर्ण करा- पालकमंत्री डॉ.भोयर

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : मानसूनचे आगमन झाले आहे. येत्या काही दिवसात मानसूनची प्रगती आणखी होणार आहे. त्यामुळे मानसून पूर्व नाला सफाईची कामे तातडीने आठवडाभरात पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यानी सव नगर परिषद व नगर पंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे. पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी जिल्हा सह आयुक्त नगर पालिका प्रशासन यांना याबाबत निर्देश देत सर्व नाल्यांची सफाई ९ जून पुर्वी करण्यात यावी व याबाबतचा अहवाल १० जन रोजी सादर करण्यात यावी, असे पालकमंत्री भोयर आदेशात म्हटले आहे.यावर्षी मानसूनचे आगमन वेळेपुर्वी झाले आहे. हवामान विभागाने यंदा सरासरी पेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. जून महिण्यात यावर्षी अधिक पाऊस होणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

मे महिण्यात जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला होता. वेळीच नाल्यांची सफाई न झाल्यामुळे पाणीसाचण्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्या आहे. पावसाचे पाणी साचल्यामुळेडासांची उत्पत्ती वाढण्याचा धाका अधिकझाले तसेच नाले सफाई वेळीच पूर्णन झाल्यास आरोग्याचा देखील प्रश्ननिर्माण होऊ शकतो. तथापि, नाल्यांची जून महिण्याच्या पहिल्या आठवडयातसफाई होणे आवश्यक असल्याने हीकामे युद्धस्तरावर करण्यात यावी, असे ही पालकमंत्री भोयर यांनी म्हटले आहे. जिल्ह्यातील वर्धा, हिंगणघाट, आर्वी,पुलगांव, देवळी, सिंदी रेल्वे नगर परिषद वसेलू, कारंजा, आष्टी, समुद्रपूर नगरपंचायतक्षेत्रात दरवर्षी काही भागांमध्ये नाल्यांचे पाणी शिरत असल्याच्या तकारी प्राप्तहोतात. त्यामुळे नाला सफाई कामामध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई होऊ नये, असे सक्त निर्देश पालकमंत्री भोयर यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *