सेंद्रिय शेतीसाठी ‘बायोचार’ उपयुक्त- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : आपल्या शेतजमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण किमान १ टक्का असणे आवश्यक असते. मात्र वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील जमिनीत सरासरी केवळ ०.२ ते ०.५ टक्के सेंद्रिय कर्ब असल्याचे माती परीक्षणातून समोर आले आहे. ही चिंताजनक बाब लक्षात घेता एमजीआयआरआय वर्धा यांनी विकसित केलेले बायो-चार निर्मिती यंत्र शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी केले. “बायो-चार निर्मिती इळेलहरी : प्रात्याक्षिक व प्रशिक्षण’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन ३० मे रोजी करण्यात आले. यावेळी गडकरी यांच्या उपस्थितीत बायो-चार निर्मिती यंत्राचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. त्यांचा पत्नी कांचन गडकरी दखील उपस्थित हात्या.
या यत्राच्या साहाय्यान शेतीतील पऱ्हाटी, तुराटी तसेच अन्य पीक अवशेष जाळून त्यापासून बायो-चार तयार करता येतो. हा बायो-चार जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी उपयुक्तठरतो.असे प्रतिपादन नितीन गडकरीयांनी केले एमजीआयआरआयचे हे यंत्र केवळ ५,००० रुपये किंमतीतउपलब्ध आहे. विशेष म्हणजेमानस उद्योग समूहाने ऊस उत्पादकशेतकऱ्यांना यंत्र खरेदीसाठी ५० टक्क अनदान दण्याची घोषणाकेली आहे. त्यामळे ऊसउत्पादक शेतकऱ्यांना हे यंत्र फक्त २,५०० रुपयांत मिळणार आहे. उर्वरित रक्कम ही त्यांच्या ऊसबिलातून कपात केली जाणारआहे.कार्यक्रमाला मान्यवरांच्याउपस्थितीत शेतकऱ्यांचा मोठाप्रतिसाद मिळाला.