वारकऱ्यांचा प्रवास सुखद होणार, राज्यभरातून २ हजार नवीन बसेस धावणार
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : महाराष्ट्रातील लाखो भाविकांना वेध लागलेत ते आषाढी वारीचे. पंढरीच्या विठुरायांच्या भेटीसाठी लाखो भाविक पंढरपुरला जातात. वारकऱ्यांचा एसटी प्रवास सुखद होणार आहे. कारण राज्यभरातून वारीसाठी दोन हजार नवीन बस धावणार आहत. इतकच नव्हे तर, वारकऱ्यांसाठी नवी कोरी लालपरी धावणार आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर लालपरी दाखल होणार आहे. त्यामुळं राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाडक्या पांडुरंगाच्या भेटीला जाण्याऱ्या भाविकांना प्रवास आता विनाअडथळ्यांचा होणार आहे. दरवर्षी आषाढी वारी आणि दिवाळीपूर्वी एसटीच्या ताफ्यातनवीन बस दाखल होत होत्या.त्यामळे आषाढी वारीत वारकऱ्यानाआणि दिवाळीला गावी जाणाऱ्या प्रवाशांना नवीन लालपरीचा प्रवासअनुभवता येत होता.
मात्र, २०१६नंतर एसटी महामंडळाकडून नवीन बसची खरेदी झालीच नाही. त्यामुळेमागील नऊ वर्षांपासून जुन्या बसनेचआषाढी वारी, दिवाळी यांचाप्रवास सुरू होता. गतवर्षी पुणेविभागातून आषाढी वारीला पुण्यातून पंढरपूरसाठी ३८० बस सोडण्यात आल्या. मात्र, या सर्व बस जुन्या होत्या, त्यामुळे भाविकांचा प्रवास थोडा कसरतीचाच होता. मात्र, यंदा राज्यातील सर्वआगारांत एसटीच्या ताफ्यात नव्यालालपरी दाखल होत आहेत. पुणे विभागात ६५ लालपरी नव्यानेदाखल झाल्या असून, पुढील महिन्याभरात तेवढ्याच बस दाखल होणार आहेत.