लोकोपयोगी कायदे करण्यात महाराष्ट्र देशात अग्रेसर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : महाराष्ट्र हे देशात सर्व क्षेत्रात अग्रगण्य राज्य आहे. लोकोपयोगी कायदे निर्मितीमध्येही राज्य देशात अग्रेसर असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढत राज्याच्या कायद्याचे अनुकरण देशातील इतर राज्यच नाही, तर अन्य देशही करत असल्याचे सांगितले. विधी व न्याय विभागाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयाजित कायकमात विधी विधान शाखेचे बोधचिन्ह अनावरण आणि पाच पुस्तकांचे प्रकाशन सह्याद्री अतिथी गृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधी व न्याय विभागाचे राज्यमंत्री ड आशिष जयस्वाल, मुख्य सचिव सुजाता सौनिक, प्रधान सचिव सुवर्णा केवले, प्रधान सचिव व विधी सल्लागार श्री शक्ला, विधी विधान शाखेचे सचिव सतीश वाघोले आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राच्या चढणघडणीमध्ये विधी व न्याय विभागाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. विधिमंडळ हे कायदेमंडळ आहे, पण कायदा निर्मितीमध्ये विधी व न्याय विभागाचे महत्त्वपूर्ण योगदानअसते.

राज्याचे अनेक कायदे देशाने स्वीकारले आहेत कायदा निर्मिती होत असताना विधिमंडळातकायद्यांवर तीन – तीन दिवस चर्चाझालेली आहे. चर्चेतून कायदाअस्तित्वात येत असतो. विभागाचेसुवर्ण महोत्सवी वर्ष असून निश्चितचया विभागात ‘ ट्रान्सफॉर्मेशन’ ची सुरुवात या वर्षापासून करावी. लोकोपयोगी व सध्या परिस्थितीलक्षात घेऊन कायदे निर्मिती करावीलागते. मागील कायद्यामध्यबदलही घडवावे लागतात. या संपूर्ण प्रक्रियेत कायदा ‘ ड्राफ्टिंग ‘ अत्यंत महत्त्वाचे असते. अचूक डाफ्टिंग असल्यान राज्याच्यकायद्यांना क्वचितप्रसंगी न्यायालयातअडचण निर्माण करण्यात आली आहे. लोकांच्या हिताच्या दृष्टीने कायदा कसा असावा, असा प्रयत्ननेहमी शासनाचा असतो. विधी व न्याय विभागाने निर्मित केलेलीपुस्तके पुढील पिढीसाठी ठेवाच आहे. हे संदर्भ साहित्य म्हणून निश्चितच कायदा निर्मितीमध्येउपयोगात येणार आहे, असेहीमुख्यमंत्री म्हणाले. विभागाच्या बळकटीकरणासाठदिलेल्या प्रस्तावाबाबत शासनसकारात्मक असून निश्चितचयाबाबत निर्णय घेतला जाईल.प्रशिक्षण ही महत्त्वाची बाबआहे. विभागात कायमस्वरूपीप्रशिक्षण धोरण असावे.

तसेचकाही प्रशिक्षण बंधनकारककरण्यात यावीत. तंत्रज्ञान वकार्यपद्धतीत होत असलेल्याबदलांशी अनुरूप प्रशिक्षणधोरण असाव. आतरवासिता कार्यक्रमांमध्ये ग्रामीण भागातील विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचीसख्या वाढवन या कायकमाची व्याप्ती विस्तृत करण्यात यावी,असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले. प्रस्ताविक सचिव सतीशवाघोले यांनी केले. त्यांनीविभागाची रचना, आव्हाने आणि विभागाची कार्यपद्धती विषदकेली. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन उपसचिव श्रीमती विनायककुल्लीवार यांनी केले. कार्यक्रमास विधी व न्याय विभागाचे अधिकारीउपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *