वर्धा जिल्ह्यात ८०० जन्म मृत्यू प्रमाणपत्र बोगस
उर्वरित प्रमाण पत्र परत घेतल्या जातील अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याला दिल्याचे सोमय्या यांनी सांगितले. त्यांनी जिल्हाधिकारी वामन्थी सी. यांची भेट घेत वर्धा जिल्ह्यातील जवळपास ८०० अनधिकृत वास्तवात असलेले रोहिंग्यांना देण्यात आलेले जन्म मृत्यू प्रमाणपत्र, रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदार यादीतील नोंदणी याच्यावर प्रश्न उपस्थित करीत तात्काळ रोहिंग्यांचे सर्व दाखले रद्द करण्याबद्दल जिल्हाधिकार्यांसोबत चर्चा केली. राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टिकोनातून वर्धा जिल्ह्यात इतया मोठ्या संख्येत वास्तवात असलेल्या रोहिंग्यांना प्रशासनाच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे प्राप्त झालेले दाखले ही अतिशय चिंतेची बाब असल्याची खंत किरीट सोमय्या यांनी व्यत करीत तत्काळ प्रशासनाने याच्यावर कारवाई करीत सर्व दाखले लवकरात लवकर रद्द व्हावी व देशाच्या सुरक्षेची चाललेला खेळ खंडोबा तात्काळ थांबावावा यासाठी आग्रही भूमिका घेतली. आपल्याकडे सर्व माहिती उपलब्ध आहे. प्रशासनानेही खरी माहिती उपलब्ध करून देत कारवाई करावी असेही निवासी जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात त्यांनी अधिकार्यांना सांगितले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी उपस्थित होते.