सावधान..!!! आपण येथून फळे विकत घेत असाल तर..

पलाश उमाटे/दै.जन-संग्राम वर्धा : शहरातील नागरिकांना योग्य सुविधा मिळावी यासाठी मुख्य फळबाजार हि शहराच्या मधोमध आहे मात्र देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अग्रेसर असणारे आपले आदर्श असणारे बाळ गंगाधर टिळक त्यांचे सभोवताली असणारी अस्वछता व घाणीचे साम्राज्य बघता ते देखील लाजतील अशी बिकट परिस्थिती टिळक मार्केट गोल बाजार मध्ये बघायला मिळत आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असणारे टिळक मार्केट गोल बाजार हे नगर परिषद थातुर मातुर साफ सफाई करते व पुनःपुनः दुर्लक्ष झाल्यामुळे अस्वछतेचे साम्राज्य जश्याच तसे बघायला मिळते.

मात्र शरीरास निरोगी आरोग्य प्रदान करणारे फळे आता या वाढत्या अस्वच्छतेमुळे जनतेला रोगराई चे निमंत्रण देत असल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे. सदर बाजारातील परिस्थिती बघता नागरिकांनी फळे व भाजी घेताना सावधगिरी बाळगण्याचे गरजेचे झाले आहे. जर आपण येथून फळे किंवा भाजी खरेदी करत असाल तर आपण निरोगी शरीरासाठी नाही तर शरीरास हानी पोहचविण्यासाठी. या सद्या परिस्थिकडे नगरपरिषदेच मुख्याधिकारि देशमुख व आरोग्य विभाग गांभीर्याने लक्ष घालतील कि जनतेला वाऱ्यावर सोडल्याप्रमाणे रुग्णालयातील गर्दी वाढवून नागरिकांच्या खिश्याला कात्री लावतील हे बघण्यासारखे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *