स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी नियोजन करा- राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद व नगर पालिकाच्या निवडणका पारदशकपण पार पाडण्यासाठी व मतदारांना मतदान केंद्रावर उत्तम सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी चांगले नियोजन करा, अशा सूचना राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर पालिका निवडणूक तयारीच्या आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ३१६ ग्रामपंचायती तसेच पंचायत समिती, जिल्हा परिषद व ६ नगर परिषदेच्या निवडणूका घेण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने आढावा घेण्यात आला. बैठकीला जिल्हाधिकारी वान्मथी सी., ग्राम पंचायत निवडणूक प्राधिकारी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्रीपती मोरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अनील गावीत, वर्धाचे उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे, आर्वीचे विश्वास शिरसाट, हिंगणघाटचे आकाश अवतारे, नगर पालिका प्रशासन अधिकारी सौरभ कावळे, परिविक्षाधिन उपजिल्हाधिकारी विनायक पाटील, वर्धेचे मुख्याधिकारी विजय देशमुख तसेच सर्व तालुक्याचे तहसिलदार उपस्थित होते.

ग्रामपंचायत व नगरपालिका क्षेत्रातील प्रभाग रचना २०११ च्या जनगणनेच्या आधारावर होणे आवश्यक असून निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार ईव्हीएम मशीनची उपलब्धता करुन ठेवावी. आवश्यकता पडल्यास निवडणूक आयोगाकडून किंवा इतर राज्यातून उपलब्ध करुन घ्याव्यात. निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार एक किंवा दोन टप्प्यात निवडणूक कार्यक्रम घेण्यात येईल, असेही यावेळी दिनेश वाघमारे यांनी सांगितले. महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती औद्योगिक नगरी अधिनियमांतर्गत नगर परिषद व नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी २०११ च्या जनगणनेनुसार सदस्य संख्या व प्रभाग रचना करावी, अशाही सूचना यावेळी दिनेश वाघमारे यांनी केल्यात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *