प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींची सोडवणूक करण्यासाठी पालकमंत्री डॅा.पंकज भोयर यांच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय जनता दरबारास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आपल्या समस्या, तक्रारी, निवेदने घेऊन आलेल्या नागरिकांशी पालकमंत्र्यांनी थेट संवाद साधला. त्यांच्या समस्या, म्हणणे जाणूण घेतले आणि त्यावर कालमर्यादेत कारवाई करण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित या जनता दरबारास जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, जिल्हा पोलिस अधीक्षक अनुराग जैन, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीपती मोरे यांच्यासह सर्व विभागप्रमुख अधिकारी उपस्थित होते. सुरुवातीस पालकमंत्री व मान्यवरांच्याहस्ते दीप प्रज्वलित करून उद्घाटन करण्यात आले. जिल्ह्यातील नागरिकांना आपल्या समस्या, तक्रारी, निवेदन जनता दरबारात सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याप्रमाणे जिल्हाभरातून आलेल्या नागरिकांची नोंदणी जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली. त्यासाठी तालुकानिहाय स्वतंत्र टेबल ठेवण्यात आले होते.
नोंदणीकेलेल्या निवेदनकर्त्यांना टोकन क्रमांक देण्यात आले. उद्घाटनानंतरपालकमंत्र्यांनी नागरिकांच्यातक्रारी, म्हणणे, समस्या जाणून घेतल्या. प्रत्येक निवेदनकर्त्यांशी त्यांनी व्यक्तीश: संवाद साधला. आत्मियतेने त्यांचे म्हणणे जाणून घेतले. वृत्त लिहेपर्यंत दरबारसुरूच होता. नागरिकांच्या समस्यास्थानिक स्तरावरच निकालीनिघणे आवश्यक आहे. असेअसतांना त्यांना तालुका, जिल्हा,विभाग व मंत्रालयापर्यंत जावलागतात. स्थानिक स्तरावरचतक्रारी का सोडवू शकत नाही, याबाबत यंत्रणेने चिंतन करणे गरजेचे आहे. जनता दरबारातनागरिक मोठ्या प्रमाणात आले आह. त्याच्या तकारी वळतनिकाली निघणे आवश्यक आह.नागरिकांना आपल्या समस्यांसाठीपालकमंत्र्याकड यायची गरजचपडू नये, तिथल्या तिथे त्यांचसमाधान होणे आवश्यक आहे. पुढील वेळी नागरिकांची गर्दीकमी होईल, यापद्धतीने जिल्ह्यातचांगले काम करा, असे पालकमंत्रीयावेळी बोलतांना म्हणाले.