मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून राज्यासह देशात वळवाचा पाऊस सुरूआहे. जूनच्या पहिल्या आठवड्यातमान्सूनला सुरूवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला होता. पण, जून महिन्याची आठ तारीख आली पण अजूनहीअनेक ठिकाणी वळवाचा पाऊस सुरू आहे.दरम्यान, हवामान विभागाने मान्सूनबाबत मोठी अपडेट दिली. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार,दिल्ली आणि वायव्य भारतात सुमारेएक आठवडा उष्णतेची लाट राहील.त्यानंतर पाऊस पडण्याची शक्यता आहे. आयएमडीनुसार, पुढील पाच दिवसांत दिल्लीत तापमानाचा पारा ३-४अंश सेल्सिअसने वाढेल. शनिवारी येथील तापमान ४० अंशांच्या आसपास पोहोचले होते.

गेल्या एका आठवड्यापासून मान्सून पुढेगेलेला नाही. कोरड्या हवेच्या अडथळ्यामुळे २९ मे पासून मान्सून पुढे गेलेला नाही. आता १२ ते १८ जून या आठवड्यात मान्सून पुढे सरकल असा अदाज आह. दशातील अनक भागांमध्ये अजूनही तेवढी उष्णता झालेली नाही. याचे कारण नैऋत्य मान्सूनचे लवकर आगमन आह. साधारणपण जनच्या अखरीस मान्सून देशाच्या वेगवेगळ्या भागात पोहोचतो. तो ८ जुलैपर्यंत संपूर्ण देशात पोहोचतो. दिल्लीत मान्सूनच्या आगमनाची तारीख साधारणपणे २७ जून असते.

पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे माजी सचिव एम. राजीवन म्हणाले की, १२जूनपर्यंत मान्सून खूपच कमकुवत राहील. याचे कारण कमकुवत मान्सूनचा प्रवाहआणि वायव्य दिशेकडून कोरड्या हवेचा प्रवेश आहे. आता मान्सूनच्या प्रगतीदरम्यानबराच विराम दिसून आला आहे. जूनच्या तिसऱ्या आठवड्यात मान्सून पुन्हा पुढेसरकेल, असंही ते म्हणाले. दरम्यान, भारतीय हवामान खात्यानेविविध राज्यांसाठी उष्णतेच्या लाटेचाइशारा दिला आहे .

यामध्ये पंजाब,हरयाणा, चंदीगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि पश्चिम राजस्थानचा समावेश आहे. आयएमडीचे शास्त्रज्ञ नरेश कुमार म्हणाले की, देशाच्या विविध भागांमध्ये तापमान सामान्यपेक्षा कमी असले तरी, पुढील चार ते पाच दिवसांत ते बदलेल. राजस्थानमध्ये ९ जूनपासून आणि पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या काही भागात १० जूनपासून उष्णतची लाट यण्याचीशक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *