या शिक्षणाच्या आयचा घो..!!!

पलाश उमाटे/दै.जन-संग्राम वर्धा : मुले मोठे व्हायला लागली प्रत्येक पालकांना वाटत कि आपल्या पाल्यानीं चांगले शिक्षण घ्यावे आणि याच भ्रांतीमध्ये मुलांचे बालपण हरवून त्यांचे कंबरडे मोडण्याचे काम शाळा करीत आहेत. मुलांच्या खेळण्याच्या वयात त्यांच्या शरीरास देखील झेपणार नाहीत इतकी पुस्तके त्यांचे पाठीवर दिल्या जात आहे. एवढेच नाही तर मुलांची बौद्धिक क्षमता वाढविण्याचे कारण पुढे करीत मोठं मोठी कॉन्व्हेंट्स पालकांकडून पुस्तकांचे नावाखाली मनमर्जी लूट करीत आहे. आश्चर्याची बाब हि आहे कधी काळी आपल्या मोठ्या भावंडांची पुस्तके घेऊन २ रुपयांत संपूर्ण वर्ष शिकणारी पिढी आज मोठं मोठी पदे भूषवित आहेत, मात्र त्यांच्याच मुलांना आज दरवर्षी नवनवीन हजारा रुपयाच पस्तक विकत घेण्यास भाग पाडले जात आहे. म्हणजे एकदा वापरलेली पुस्तके सरळ रद्दीत, ती पुस्तके आता कामी येणार केवळ चिवडा नास्ता करण्यासाठीच..??

शाळेतील विद्यार्थ्यांचा वर्ग आणि शालेय बोर्ड उइडए एक असल्यावर पुस्तके प्रत्येक शाळेची वेगळी आणि किंमतीत फरक कसा काय.??? उइडए बोड च शिक्षण देणाऱ्या केंद्रीय विद्यालय व जवाहर नवादय विद्यालय यांना देखील सारखा पाठयक्रम असतो मात्र यांचे पुस्तके व इतर शाळांच्या पुस्तकात मोठी तफावत आहे त्यातही शाळेंद्वारे पाठयक्रम सारखाच असताना दरवर्षी नवीन प्रकाशनाचे पुस्तके घेण्यास बाध्य केले जाते..??? लूट इतक्यावरच नाही तर चक्क विद्यार्थ्यांची शालेय सामग्री सुद्धा ठराविक ठिकणावरून घेण्याचा अट्टाहास शाळेंद्वारे केला जातोय, हि सर्व परिस्थिती बघता सर्वसामान्य जनतेच्या पैश्यांची लूट करीत असताना शिक्षण विभाग गप्प का..??? शिक्षणाचा कर सव नागरिक भरतात मात्र त्याचा लाभ न मिळता वरून पिळवणूकच होत आहे, यांस जबाबदार कोण..?? या सर्व बाबीत शिक्षण विभाग व शाळेंचे टेबल खालून काही व्यवहार तर होत नाही ना..?? या सर्व बाबींकडे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री व वर्ध्याचे पालक मंत्री पंकज भोयर नागरिकांचे हितार्थ पाऊल उचलतील का??? या कडे समस्त पालकांचे लक्ष लागलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *