या शिक्षणाच्या आयचा घो..!!!
शाळेतील विद्यार्थ्यांचा वर्ग आणि शालेय बोर्ड उइडए एक असल्यावर पुस्तके प्रत्येक शाळेची वेगळी आणि किंमतीत फरक कसा काय.??? उइडए बोड च शिक्षण देणाऱ्या केंद्रीय विद्यालय व जवाहर नवादय विद्यालय यांना देखील सारखा पाठयक्रम असतो मात्र यांचे पुस्तके व इतर शाळांच्या पुस्तकात मोठी तफावत आहे त्यातही शाळेंद्वारे पाठयक्रम सारखाच असताना दरवर्षी नवीन प्रकाशनाचे पुस्तके घेण्यास बाध्य केले जाते..??? लूट इतक्यावरच नाही तर चक्क विद्यार्थ्यांची शालेय सामग्री सुद्धा ठराविक ठिकणावरून घेण्याचा अट्टाहास शाळेंद्वारे केला जातोय, हि सर्व परिस्थिती बघता सर्वसामान्य जनतेच्या पैश्यांची लूट करीत असताना शिक्षण विभाग गप्प का..??? शिक्षणाचा कर सव नागरिक भरतात मात्र त्याचा लाभ न मिळता वरून पिळवणूकच होत आहे, यांस जबाबदार कोण..?? या सर्व बाबीत शिक्षण विभाग व शाळेंचे टेबल खालून काही व्यवहार तर होत नाही ना..?? या सर्व बाबींकडे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री व वर्ध्याचे पालक मंत्री पंकज भोयर नागरिकांचे हितार्थ पाऊल उचलतील का??? या कडे समस्त पालकांचे लक्ष लागलेले आहे.