
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : मागील काही दिवसांपासून वर्धा तालुक्यातील नदी नाल्यांना रेती तस्करांची काळी नजर लागली आहे. या नदी- नाल्यातून सर्रास रतीच उत्खनन करून त्याची टक्टर इतर वाहनाद्वार अवधरित्या वाहतक करण्यात येत आहे. त्यामुळे नदी -नाल्यात मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. दिवसाकाठी शेकडो ब्रास रेतीची तस्करी करण्यात येत आहे. त्यामळ शासनाच्या तिजारीला फटका बसत आहे. वर्धा तालुक्यातील सेलसुरा येथील भदाडी नदी मधून दिवसाढवळया रेतीची वाहतूक होत असताना देखील अद्याप महसूल प्रशासनाने एकाही वाहनावर कारवाई केली नाही. त्यामुळे कुठेतरी पाणी मुरत असल्याची शंका उपस्थित केल्या जात आहे.एकीकडे घरकुल धारकांनी रेती उपलब्ध होत नाही आह तर दसरीकड ह रती माफिया चोरीच्या मार्गाने सर्रास रेती ची वाहतूक करीत आहे.मात्र या अवैध रेती चोरी कडे तहसीलदार साहेब दुर्लक्ष का करीत आहे ? या रेती चोरट्यानंवर नेमका आशीर्वाद कोणाचा? असा प्रश्न जनतेच्या माध्यमातून पुढे येत आहे.