धरती आबा योजनेंतर्गत पालघर जिल्ह्यातील ६३५ गावांचा समावेश -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री फडणवीस याच्या हस्ते प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत धरती आबा लोकसहभाग मोहिमेचा शुभारंभ पालघर जिल्ह्यातील मनोर येथे करण्यात आला यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमास वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक, कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, (दूरदृश्यप्रणालीद्वारे) आदिवासी क्षेत्र आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडित, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, माजी मंत्री रवींद्र चव्हाण ,खासदार डॉ. हेमंत सावरा, आमदार सर्वश्री राजेंद्र गावित , स्नहा दुबे- पंडित, राजन नाईक, हरिश्चंद्र भोये, निरंजन डावखरे, आदिवासी विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनीषा वर्मा, मुख्यमंत्री यांचे सचिव श्रीकर परदेशी, जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे उपस्थित होते. धरती आबा योजनेंतर्गत गावातील रस्ते, पिण्याचे पाणी, प्रत्येक घरात वीज, प्रत्येक घरात गॅस जोडणी, आरोग्य, शिक्षण, रोजगार, माता कल्याण, पोषण आहार अशा एकूण २५ योजना धरती आबा योजनेच्या माध्यमातून लागू करण्यात येणार आहेत.
ज्या गावांमध्ये ५०० पेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्या आहे तसेच ज्या गावात ५० टक्के पेक्षा जास्त आदिवासी समाज राहतो अशा गावांचा समावेश या योजनेंतर्गत करण्यात येणार आहे. राज्यातील पालघर, गडचिरोली यांसह इतर दोन जिल्हे आहेत. त्या जिल्ह्यामध्ये ५० आदिवासी लोकसंख्या असेल तरी ते गाव धरती आबा योजनेंतर्गत समाविष्ट करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले वैयक्तिक पद्धतीमध्ये प्रत्येक व्यक्तीस तर सामूहिक पद्धतीमध्ये आदिवासी समहाचा या योजनेमध्ये विचार करण्यात येणार असून १७ विभागाच्या २५ विविध योजना राबविल्या जाणार आहेत. या योजनेंतर्गत आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पायाभूत सुविधा मिळणार आहेत. आदिवासी समाजामध्ये धरती आबा योजनेमुळे परिवर्तन होणार असून आदिवासी समाजाचा विकास करण्यासाठी ही मोठी संधी आहे.
भगवान बिरसा मुंडा यांना धरती आबा असे म्हटले जात असे. पारतंत्र्याच्या काळामध्येइंग्रज राजवटीविरुद्ध भगवानबिरसा मुंडा यांनी बंड करूनआदिवासी समाजाला न्याय दिलाअसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. येत्या काळामध्ये पालघरजिल्ह्यामध्ये तीन लाख कोटीरुपयांची गुंतवणूक होणार असून या माध्यमातून दहा लाख रोजगारनिर्मिती होणार असल्याचा विश्वासवन मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनीव्यक्त केला. मख्यमत्री दवेंद्र फडणवीसयांनी राज्याच्या विकासाचामूलभूत आराखडा तयार करून तो कृतीमध्ये आणण्यासाठी सर्व विभागांना शंभर दिवसाचा सात कलमी कार्यक्रम दिला होता. तोसर्व विभागाने यशस्वीरित्या पूर्णकेला असून येत्या काळात दीडशेदिवसाचा कृती आराखडा देण्यातयेणार आहे.
या आराखड्याबाबतप्रशासकीय यंत्रणा गांभीर्यानेकामाला लागली असल्याचेपालकमंत्री गणेश नाईक यांनीसांगितले. वन विभागामार्फत राज्यात११ कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्टअसून त्या दृष्टीने वन विभागाची गतिमान पद्धतीने वाटचाल सुरू आहे. तसेच येत्या साडेचारवर्षांमध्ये आठ २५० कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट वन विभागाने ठेवले आहे. पालघर जिल्हा निसर्गरम्य जिल्हा आहे. आता या जिल्ह्याची प्लास्टिक मुक्त पालघर जिल्हा दुर्गंधी मुक्तपालघर जिल्हा या ध्येयाकडेवाटचाल चालू असल्याचेपालकमंत्री गणेश नाईक यांनीसांगितले. जिल्ह्यामध्ये ७३५ शासकीयशाळा असून या शाळांमध्येकौशल्य विकास अभ्यासक्रम सुरूकरण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे मंत्री मंगल प्रभातलोढा यांनी सांगितले.