सेवा हक्क दिनानिमित्त विविध उपक्रम प्रभावीपणे राबवा- जिल्हाधिकारी वान्मथी सी.

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : जिल्ह्यामध्ये ग्रामीण व जिल्हास्तरावर येत्या २८ एप्रिल रोजी सेवा हक्क कायद्याची दशकपूर्ती व पहिला “सेवा हक्क दिन’ साजरा करण्यासाठी शासनाने निर्धारीत केलेले विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना, जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात “सेवा हक्क दिन’ साजरा करण्यासंदर्भातील पूर्व तयारीचा आढावा घेण्यात आला. यावेळी बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी, अतिरिक्त पोलीस अधिक्षक सागर कवडे सर्व विभागा प्रमुख उपस्थित होते. पात्र व्यक्तींर्ना पारदर्शक, कार्यक्षम व समयोचित लोकसेवा देण्याकरिता आणि व्यक्तींर्ना पात्र लोकसेवा देणाऱ्या शासकीय विभागांमध्ये पादर्शकता व उत्तरदायित्व आणण्यासाठी राज्यात २८ एप्रिल २०२५ पासून लोकसेवा हक्क कायद्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

राज्य शासनाने या वर्षीपासूनच २८ एप्रिल हा “सेवा हक्क दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे आणि या कायद्याची दशकपूर्तीही होत आहे. या निमित्ताने जिल्ह्यातील ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासन, नगर परिषदा व नगर पंचायतांच्या कार्यक्षेत्रांमध्ये राबवायच्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी देण्यात आली. अनुषंगिक मार्गदर्शन व सूचनाही करण्यात आल्या. सेवा हक्क दिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायत स्तरावर आदर्श आपले सरकार केंद्राचे उद्घाटन करणे, विशेष ग्रामसभेचे आयोजन करून लाकसवा हक्क कायद्याच्या ठळकतरतदींच वाचन करून गामपचायत सदस्यांनकायद्याच्या प्रती वितरीत करण, प्रत्यकग्रामपंचायतीमध्ये या कायद्याची माहितीदेणारे सूचना फलक लावणे, अधिसूचितसेवांची व शुल्काची माहिती देणारे क्यू आर कोड लावणे आदी उपक्रम राबविण्याबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.

जिल्हास्तरावर सेवा हक्क दिननिमित्ताने विविध समारंभाचे आयोजन करून लोकसेवाहक्क कायद्याचे वैशिष्ट्ये विषद करणे आणि विविध विभागाकडून दण्यात येणाऱ्या सवाच्यआढावा घेवून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार करणे, जिल्ह्यात सेवा दूत योजना सुरू करणे, नागरिकांना एसएमएसद्वारे या कायद्याबाबत व आपले सरकार पोर्टलची माहिती देणे, शाळा व महाविद्यालयांमध्ये या कायद्याच्या जागृतीसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करणे, लोककलांद्वारे या कायद्याचा प्रचार-प्रसार करण्याबाबत यावेळी सूचना देण्यात आल्या. नगरपालिका क्षत्रांमध्य सवा हक्क दिनानिमित्ताने विशेष सभेचे आयोजन करून या कायद्यात अंतभर्ूत सेवा देण्याच्या कामगिरीचा अहवाल सादर करणे, नागरिकांना घरपोच सेवा देण्यासाठी “सेवादूत’ योजना सुरू करणे, नागरी सुविधा केंद्रांद्वारे सेवा हक्क कायदा व आपले सरकार पोर्टलबाबत माहिती देणे, प्रभाग कार्यालय, पर्यटन व तिर्थस्थळे, महाविद्यालय परिसर आदी ठिकाणी लोक सेवा हक्क कायद्याबाबत माहिती फलक लावण्याबाबत यावेळी श्रीमती. जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी उचित मार्गदर्शन करून सूचना दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *