दिवाळीत शेतकऱ्यांना पावसाचे फटके
ज्या शेतकर्यांचे सोयाबीन निघाले त्यांनी चार पैसे मिळतील या आशेने शुक्रवार २४ रोजी बाजार समितीत सोयाबीन विक्रीस नेले होते. अचानक दुपारच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. सेलू बाजार समितीत शेतकर्यांचे सोयाबीन भिजून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या प्रकारामुळे शेतकरी आक्रोशित झाले असून संतप्त शेतकर्यांनी सभापती आणि सचिवांना धारेवर धरत रोष व्यत करीत निषेध केला. सभापती आणि सचिव यांच्या उपस्थितीत शेतकर्यांनी आपला आक्रोश व्यक्त करत बाजार समिती प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली. हिंगणघाट बाजार समितीत सुद्धा काही प्रमाणात शेतमाल भिजला होता. परंतु, भिजलेला सर्व शेतमाल खरेदी केल्यान शेतकर्यांना दिलासा मिळाला.
जिल्ह्यातील शेतकरी सध्या रब्बी हंगामाच्या कामात व्यस्त आहेत. परिपव झालेल्या कापसाची वेचणी सुरू आहे. मात्र, निसर्गाने पुन्हा एकदा शेतकर्यांची परीक्षा घेतली आहे. शुक्रवारी अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले आणि काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्यांच्या आशांवर पाणी फिरले. वेचणीला आलेला कापूस ओलाचिंब होत असल्याने शेतकर्यांवर निसर्गाचे संकट पुन्हा ओढावत आहे. त्यामुळे कापसाच्या गुणवत्तेवर परिणामी बाजारात दर कमी मिळण्याची भीती शेतकर्यांमध्ये निर्माण झाली आहे. शेतकरी नाव्हेंबर महिन्यात गहू आणि चना पेरणीला सुरुवात करतात. यंदा परतीचा पाऊस लांबल्याने सोयाबीन काढणीला विलंब झाला. अद्याप ५० टके सोयाबीन शेतकर्यांच्या शेतातच उभे आहे. परिणामी, सोयाबीन काढणे, जमिनीची मशागत याला वेळ होणार आहे. रब्बी हंगातील पिकांची पेरणी उशिरा होईल, असे शेतकरी बोलत आहेत.









