अखिल भारतीय चरखा संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त राष्ट्रीय ऑनलाइन परिसंवाद

 प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : २२ सप्टेंबर १९२५ रोजी महात्मा गांधींनी पाटणा येथे “अखिल भारतीय चरखा संघ’ ची स्थापना केली. त्या दिवशी त्यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय काँग्रेस समितीची बैठक झाली होती. त्या वेळी गांधीजी म्हणाले होते – चरखा संघ हा सक्रियपणे कार्य करणारा संघ असावा… परदेशी कापडाच्या बहिष्कारासाठी साधन आणि सामर्थ्य दान्ही त्याच्याकडे असतील. २४ सप्टेंबर १९२५ रोजी या संघाचे संविधान तयार झाले. त्याच्या कार्यकारिणीमध्ये महात्मा गांधी, मौलाना शौकत अली, डॉ. राजेंद्र प्रसाद, सतीशचंद्र दासगुप्त, जमनालाल बजाज आणि शंकरलाल बँकर यांसारखे अनेक नामवंत व्यक्ती सहभागी झाले होते.

या संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त (१९२५-२०२५) खादी मिशन सेवा ट्रस्ट आणि मुदित शिक्षण संस्था, वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय राष्ट्रीय ऑनलाइन परिसंवाद आयोजित करण्यात येत आहे. हा परिसंवाद १५ ते १७ ऑक्टोबर २०२५ दरम्यान दररोज सायंकाळी ६:३० वाजता ऑनलाइन माध्यमातून होणार आहे. कार्यक्रमाचे संयोजक डॉ. पंकज कुमार सिंग यांनी सांगितले की, या परिसंवादात देशभरातील खादी संस्था, गांधीवादी कार्यकर्ते, खादीप्रेमी, प्राध्यापक आणि विद्यार्थी सहभागी होतील. सर्वांना जोडण्याचे आणि कार्यक्रम सुरळीतपणे चालवण्याचे काम मदित बाल विद्यालयाच्या प्राचाया अपर्णा सिंह यांच्या नेतृत्वाखाली केले जाईल.

या परिसंवादात विविध विषयांवर विचार मांडणारे प्रमुख वक्ते – प्रो. (डॉ.) उल्हास जाजू (सेवाग्राम), प्रो. पुष्पेंद्र दुबे (मॅनेजिंग ट्रस्टी, खादी मिशन सेवा), महेश कुमार सिंग (एमगिरी), डॉ. राजीव रंजन गिरी (दिल्ली विश्वविद्यालय), डॉ. भारती देवी, जवाहरलाल सेठिया (राजस्थान खादी ग्रामोद्योग संस्था संघ), अशोक कुमार शरण (माजी संचालक, खादी आणि ग्रामोद्योग आयोग), मुकेश लुतडे (मगन संग्रहालय), प्रो. आर. पी. द्विवेदी (महात्मा गांधी काशी विद्यापीठ, वाराणसी), चिन्मय वसंत फुटाणे (ग्राम सेवा मंडळ, गोपुरी) आणि प्रो. नृपेन्द्र प्रसाद मोदी (महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ) आपले विचार मांडतील. दररोज एक मुक्त सत्र देखील ठेवण्यात आले आहे, ज्यात सर्व सहभागी आपले विचार आणि अनुभव शेअर करू शकतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *