सेवा पंधरवड्यातून हजारो नागरिकांना विविध शासकीय सेवांचा थेट लाभ- पालकमंत्री डॉ.पंकज भोयर
यामुळे जिल्हाभरातील पांदन रस्ते मोकळे होऊन त्यांना नंबर प्राप्त होणार आहे. दुसरा टप्पा घरकुलासाठी जागा उपलब्ध नसलेल्या नागरिकांना पट्टे वाटपाचा होता. अनेक नागरिकांना पंधरवड्यात पट्ट उपलब्ध झाल्यान त्यांना हक्काच घर उपलब्ध होण्याचा मार्ग निर्माण झाला आहे. तिसऱ्या टप्प्यात विविध प्रमाणपत्र, दाखले वाटपाची मोहिम राबवून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे पुढे बोलतांना पालकमंत्री डॉ.भोयर म्हणाले. विविध विभागांच्यावतीने विविध नाविण्यपुर्ण उपक्रम पंधरवड्यात राबविण्यात आले. जिल्ह्यात पांदनरस्ते, पट्ट्यांचा चांगला उपक्रम या दरम्यान झाला आहे. जिल्हा प्रशासनाने सेवा पंधरवडा अतिशय चांगल्या पद्धतीने राबविल्याने जिल्ह्यात चांगले काम होऊ शकले.
जिल्हा प्रशासनाचे काम कौतुकास्पद ठरले, असे पालकमंत्री म्हणाले. जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी पंधरवडा कालावधीत सर्वच विभागांनी चांगले काम केले. हे काम पुढेही असेच सुरु राहील, असे सांगितले. प्रास्ताविकात उपविभागीय अधिकारी दिपक कारंडे यांनी पालकमंत्री डॅा.पंकज भोयर यांच्या संकल्पनेतून सेवा पंधरवडा राबविण्यात आला. पंधरवड्यातील उपक्रमात २६ विभागांनी सहभाग नोंदविला. हजारो नागरिकांना थेट सेवा यामाध्यमातून उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याचे सांगितले. यावेळी विविध योजनांच्यालाभार्थ्यांना पालकमंत्र्यांच्याहस्ते लाभ, प्रमाणपत्र, पट्ट, दाखल्याचे वाटपकरण्यात आले. तसेच सेवा पंधरवड्यातउत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी,कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचलन नायब तहसिलदार अजय धर्माधिकारी यांनी केले तर आभार तहसिलदार संदीप पुंडेकर यांनी मानले. कार्यक्रमास वर्धा उपविभागातील नागरिक, लाभार्थी, विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.









