मदन उन्नई धरणाच्या भिंतीवर उगविली मोठमोठी झाड

दिलीप पिंपळे/दै.जन-संग्राम वर्धा : सेलू तालुक्यातील मौजा वडगाव येथील मदन उन्नई धरणाचे बाबतीत एक ना अनेक गैर प्रकार दररोज उघकिस येत असुन या धरणाचे भिंतीवर मोठ मोठी झाड उगवली असन २५ वषापासन विदभ पाटबंधारे विभागाचे या कडेअक्षम्य दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. हा प्रकल्प २००५ साली कार्यान्वित झाला तेव्हापासून या धरणावरील भिंतीची साफसफाईच न केल्यामुळे या भिंतीवर मोठ मोठी झाडे झुडपे वाढुन एक प्रकारचे जंगलच तयार झालेले आहे, वीस वर्षापासून देखभाल दुरुस्तीसाठी आलेला करोडो रुपयाचा शासकीय निधी कुठे,आणी कुणाच्या घश्यात जातो,हा संशोधनाचा विषय आहे.

धरणाच्या भिंतीवर वाढलल्या या झाडाझुडपामुळे भविष्यातील पावसाळ्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. धरणाच्या भिंतीवर कोणत्याही प्रकारचे झाडे झुडपे वाढू नये असा नियम आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही धरणाचे भिती वर झाडें झुडपे वाढल्याचे दिसुन येत नाही. झाडे झुडपे वाढल्यामुळे पावसाळ्यात झाडाच्या मुळाशी पाणी शिरून धरण फुटण्याची शक्यता मोठया प्रमाणात असते. महाराष्ट्रात खेकड्यानी सुरुंग केल्यामुळे व धरणाच्या भिंतीवर झाडे झुडपे वाढल्याने पावसाळ्यात धरण फुटल्याचे प्रकार घडल्याने असंख्य लोकांना यात आपला जीव गमवावा लागला आहे मालमत्तेचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन गावेची गावे यात वाहून गेलेली आहे, भविष्यात अशा प्रकारची घटना घडण्याचीशक्यता नाकारता येत नाही. तरी जिल्हा अधिकारी व अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापनसमिती यानी या कडे लक्ष देण्याची नितांतगरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *