
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल होताना दिसत आहे. कधी कडाक्याचं ऊन्ह तर कुठे पावसाच्या जोरदार सरी. हवामान विभागाने बर्फाच्या गारा देखील कोसळणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागान मबईसह महाराष्ट्रातील काही शहरांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिल्यानंतर एका दिवसानंतर, खचऊ ने उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती हळूहळू कमी होऊन तापमान हळूहळू कमी होण्याचा अंदाज वर्तवला.