शक्तीपीठ महामार्गाची होणार सेवाग्राम येथून सुरूवात
सेवाग्राम विकास आराखडयातंर्गत परिसराचा भाजपा सरकारच्या काळात विकास झाल्यानंतर भाजपा सरकारने सेवाग्रामला पुन्हा एक अनोखी भेट दिली आहे. नागपूर ते गोवा या शक्तीपीठ महामार्गाची सुरूवात वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथून होणार असल्याचे मख्यमत्री फडणवीस यानी जाहीर कल आह. ८०२ किमी च्या या मार्गामुळे विदर्भ व मराठवाडयाची कनेक्टीविटी वाढणार असून या दोन्ही भागाच्या विकासासाठी मोलाचा दगड ठरणार आहे. शक्तीपीठ महामार्गमुळे कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी माता, माहूरची रेणूका माता, अंबेजोगाईची योगेश्वरी माता आदी शक्तीपीठे एकमेकांशी जोडल्या जाणार आहे. परळी वैजनाथ, औंढा नागनाथ सह अन्य तिर्थस्थळे देखील मागाशी जाडली जाणार असल्यान हा महामाग पर्यटनासोबतच मराठवाडा व विदर्भाच्या विकासाला गती देणारा ठरणार आहे.
मार्ग १२ जिल्ह्यातून जाणार आहे. समृद्धी महामार्गाशी जिल्ह्याला जोडल्या नंतर आता शक्तीपीठ महामार्ग देखील जिल्ह्यातून जात असल्याने जिल्ह्याच्या विकासाला माठी चालना मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर-गोवा शक्तीपीठ द्रुतगती मार्गाचेबांधकाम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.त्या अनुषंगाने आज जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृह,मुंबई येथे भेट घेऊन त्यांचे आभार मानले. शक्तीपीठ महामार्ग आगामी काळात सर्वांना विश्वासात घेऊन पूर्णकरण्यात येणार आहे. या द्रुतगती मार्गामुळे मार्गावरील प्रमुख धार्मिक क्षेत्र व तीर्थस्थळे जोडण्यात येणार आहे. तसेच विकासाला गतीमिळण्यासोबतच प्रवाशांच्या वेळेची बचत होईल, असा विश्वास पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी व्यक्त केला. सदर महामार्गाची प्रत्यक्ष सुरुवात जिल्ह्यातील सेवाग्राम येथून होणार असल्याने जिल्ह्यातील तसेच राज्याच्याआथिक विकासाला दखील चालना मिळणार,असल्याचे पालकमंत्री भोयर म्हणाले.