वर्धेतील प्रधानमंत्री आवास योजनेत लाभार्थ्यांना मंजुरी पत्र

वर्धा/प्रतिनिधी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत जिल्ह्यातील १९ हजार ९० लाभाथ्याना २२ रोजी मंजुरी पत्र वितरण तर १४ हजार ९५४ लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरण करण्यात आला. जिपच्या सिंधूताई सपकाळ सभागृह येथे खा. अमर काळे यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य अतिथी म्हणून उपायुक्त विवेक इलमे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज गोहाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल भोसले उपस्थित होते. राज्यात राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृह निर्माण कार्यालयाच्या माध्यमातून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना, मोदी आवास योजना अशा विविध ग्रामीण गृहनिर्माण योजना तसेच त्यांना पुरक पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना, ग्रामीण भागातील अतिक्रमण नियमाकुल करणे आदी योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहेत.

केंद्रीय गृह मंत्री, अमित शहा यांच्या शुभहस्त व मख्यमत्री देवन्द्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महा आवास अभियान २०२४-२५ अंतर्गत प्रधानमंत्री आवासयोजना ग्रामीण टप्पा-२ मधील लाभार्थ्यांनामंजूरी पत्र वितरण व लाभार्थ्यांना प्रथम हप्तावितरण बालेवाडी पुणे येथून झाले आहे. जिल्हा परिषद वर्धा येथील कार्यक्रमासकार्यकारी अभियंता बांधकाम शुभम गुंडतवार,कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा धिरज परांडे उपस्थित होते. यशस्वीतेकरिता चेतन ठाकरे, अतुल तुरणकर, राजेश घरतकर, नरेशपवार, सोनाली सोमनाथे, श्रीमती, अर्चना पाटील यानी सहकार्य केले. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणटप्पा १ मध्ये १६६१०, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ मध्ये ११७, रमाई आवास योजनेत ७४४१, शबरी आवास योजनेत ४४५५ घरकुले पूर्ण करण्यातआली आहेत. महाराष्ट्र शासनाच्या १०० दिवसाच्या कार्यक्रमामध्ये वर्धा जिल्ह्याला १९०४ घरकुले ३१ मार्चपर्यत पूर्ण करण्याचेउद्दिष्ट देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *