डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे सीबीआयकडे सोपवली
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम नवी दिल्ली : देशभरात वाढत असलेल्या डिजिटल अरेस्ट आणि सायबर फसवणूक प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. सुप्रीम कोर्टाने सोमवारी महत्त्वाचा आदेश देत, भारतभरातील सर्व डिजिटल अरेस्ट प्रकरणांची तपासणी उइख कड सोपवली आह.
आता या प्रकरणाची पुढील सुनावणी दोन आठवड्यांनंतर होणार आहे. सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितले की, राज्यांची पोलिस यंत्रणा उइख ला पूर्ण सहकार्य करेल, तसेच खढ इंटरमीडियरी नियम २०२१ अंतर्गत इतर सर्व प्राधिकरणांनाही उइख ला सहाय्य करणे बंधनकारक असेल. सरन्यायाधीश सूय कांत यांनी सांगितले की, बहुतांश राज्यांमध्ये वरिष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात सायबर गुन्ह्यांचे बळी ठरत आहेत. सादर केलेल्या माहितीच्या आधारे न्यायालयाने सायबर फसवणुकीचे तीन प्रमुख प्रकार निश्चित केले आहेत.









