मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी उपयुक्त- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई/प्रतिनिधी शेतकऱ्यांना दिवसाही वीज उपलब्ध होण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अतिशय उपयुक्त ठरणार असून शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठीची ही ‘फ्लॅगशीप’ योजना सर्व जिल्ह्यांमध्ये अतिशय प्रभावीपणे राबविण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या एक दिवसीय परिषदेत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना- २.० च्या लोकार्पणाचा कार्यक्रम झाला.

यावेळी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव डॉ नितीन करीर, अपर मुख्य सचिव दीपक कपूर, ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, प्रधान सचिव एकनाथ डवले, अध्यक्ष व व्यवस्थापकीय स म्हणाले, शेती आणि शेतकरी राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून राज्य शासन ंचालक दिनेश वाघमारे, विजय सिंगल, पी अन्बलगन, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ श्रीकर परदेशी, तसेच विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी उपस्थित होते. यावेळी मिशन- २०२५ या पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या पाठिशी भक्कमपणे कायम उभेआहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. कारण ही स्वस्त आणिहरित ऊर्जा आहे. क्रॉस सबसिडी कमी होण्याच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रालाही हीयोजना चालना देणारी ठरेल. या योजनेच्यामाध्यमातून जास्तीत जास्त फीडर हे सौर ऊर्जेवर आणण्यावर भर देण्यात येणार आहे.सौर ऊर्जेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसावीज उपलब्ध होणारा जिल्हा करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी प्रयत्नशील रहावे.

या प्रकल्पांमध्ये जमिनीची उपलब्धता कालबद्ध होणे हे अत्यंत गरजेचे असल्याने साठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी महावितसब स्टेशनच्या पाच ते दहा किलोमीटरमध्येसणाऱ्या शासकीय व निमशासकजमिनींची माहिती गोळा करावी. त्यातील ज्या जमिनी प्रकल्प उभारण्यासाठी सुयोग्य असतील त्या जमिनी आवश्यक ती सगळीप्रक्रिया करून या सर्व प्रकल्पांसाठी उपलब्धकरून द्याव्यात, असे निर्देशही उपमुख्यमंत्रीफडणवीस यांनी दिले.

ग्रामपंचायत अंतर्गत विविध सुविधाही

सौर ऊर्जेवर पुढील टप्प्यात ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या विविध सुविधा, कार्यालये पूर्णपणेसौर ऊर्जेवर करण्यावर भर देण्यात येणार आहे. सौर ऊर्जा विकासाच्या क्षेत्रात मोठे उद्योग येण्यास उत्सुक आहेत. बॅटरीवरील पंपही भविष्यात मोठे बदल घडवून आणणारेठरतील. सर्व जिल्हाधिकारी यांनी मुख्यमंत्रीसौर कृषी वाहिनी योजना २.० योजनेचा संबंधित जिल्ह्यांत अधिकाधिक प्रचार-प्रसार करावा, असे निर्देशही उपमुख्यमंत्रीफडणवीस यांनी दिले. ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभाशुक्ला प्रास्ताविकात म्हणाल्या, वीज क्षेत्रातगेल्या दशकात मोठे बदल झाले आहेत.

२०१७ मध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना नावाने भविष्याचा वेध घेणारीमहत्त्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आली.याद्वारे किफायतशीर सौर ऊर्जेचा फायदा औद्योगिक ग्राहकांसह शेतकऱ्यांनाही कसाकरून देता येईल याचा विचार करण्यात आला. स ुरुवातीच्या काळातील या योजनेच्या अंमलबजावणीचे उत्साहवर्धक परिणाम दिसून आले आहेत. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना दिवसा पुरवठाउपलब्ध होणार असून त्यामुळे शेतकऱ्यांचासिंचनाच्या वेळी होणारा त्रासही कमीहोणार असल्याचे शुक्ला यांनी सांगितले.