महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनासाठी “बहारी’ सायकलने रवाना
यापूर्वी, दि. ५ ते १२ नोव्हेंबर हा पक्षीसप्ताह साजरा करण्यात यावा, या मागणीचे निवेदन घेऊन बहारी वर्धेवरून मुंबई येथे मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी सायकलने गेले होते. सायकल हे शून्य कार्बन उत्सर्जक व आरोग्यदायी वाहन असल्यामुळे त्याचा उपयोग नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन कामांसाठी केला पाहिजे, अशी भूमिका बहार नेचर फाउंडेशनने कायम मांडली आहे. वर्ध्याहून प्रवासाला निघताना या सायकलस्वारांना विनोद सामक, प्राजक्ता विरखडे, दर्शन दुधाने, देवर्षी बोबडे, अतुल शर्मा, जयंत सबाने, दीपक गुढेकर यांनी निरोप दिला. तर बहारचे पदाधिकारी डॉ. बाबाजी घेवडे, संजय इंगळे तिगावकर, राजदीप राठोड, डॉ. आरती प्रांजळे घुसे, पराग दांडगे, घनश्याम माहोरे, पवन दरणे व अन्य पक्षीमित्रांनी सायकलस्वारांना सुखरूप प्रवासाकरिता सदिच्छा दिल्या असून निसर्गप्रेमींनी शेवगाव येथील महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाला मोठ्या संख्येत उपस्थित राहून तेथील वैचारिक व अभ्यासपूर्ण सत्रांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.