आर्वी येथील रेल्वे आरक्षण केंद्र बंद खासदार श्री अमर काळे यांनी घेतली दखल

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : वर्धा लोकसभा मतदार सघातील आर्वी यथील रेल्वे आरक्षण केंद्र बंद असल्याचे आर्वी येथील नागरीकांनी श्री अमर काळे खासदार यांचे लक्षात आणून देताच श्री अमर काळे यांनी तात्काळ रेल प्रबंधक नागपूर यांच्याशी संपर्क साधला व ही बाब त्यांचे कानावर घातली. लोकांची कशी गैरसोय होत आहे हे त्यांचे लक्षात आणून दिल्याबरोबर रेल्वे विभाग खडबडून जागे झाले व हे आरक्षण केंद्र आठ दिवसात सुरु होईल असे खासदार महोदयांना रेल्वे विभागाकडून सांगण्यात आले.

आर्वी-पुलगाव रेल्वे पूर्वीचे काळी सुरू होती व आर्वी येथे रल्वे स्टेशन होते व तेथूनच आरक्षण पण व्हायचे. सध्या पुलगाव-आर्वी रेल्वे लाईन खासदार श्री अमर काळे यांनी आपल्या सकारात्मक पाठपुराव्यातून ही लाईन ब्रॉडगेज मंजूर झाली असून हीच लाईन आर्वीचे पुढे वरुड पर्यंत वाढविली जाणार आहे. त्यामुळे पुलगाव ते आमला स्टशन तसच आर्वी त आमला व आमला व पुलगाव हे दोन्ही केंद्रीय दारुगोळा भांडार या लाईनमुळे जोडले जाणार आहे. त्यामुळे आर्वी-आष्टी मोर्शी वरुड या भागातील लोकांना रेल्वेची सुविधा उपलब्ध होणार आहे. ही रेल्वे लाईन बंद असल्याने आर्वी रेल्वे स्टेशनवरील आरक्षण केंद्र मुख्य डाकघर वर्धा येथेस्थलांतरीत करण्यात आले होते. तेथील आरक्षण केंद्र सुध्दा बरेच दिवसापासून बंद होते.

सदर बाब काही सज्ञ नागरिकानी खासदारश्री अमर काळे यांच्या कानावर घातली. बाबीचे गांभिर्य ओळखूनखासदार श्री अमर काळे यांनी ही बाब तात्काळ प्रबंधक मध्य रेल्वे नागपूर यांचेशी फोनद्वारे संपर्ककेला. लोकांना होणारा त्रास व अडचणी त्यांचे कानावर घातली व रेल्वे आरक्षण केंद्र तात्काळ सुरुकरणेबाबत निर्देश दिलेत. सदर आर्वी मुख्य डाकघरयेथील रेल्व आरक्षण कद्र आठ दिवसात सरु होइल असरेल्वे विभागाकडून खासदारमहादयाना सागण्यात आल. त्यामळआर्वी येथील आरक्षण केंद्रलवकरच सुरु होण्याचा मार्गमोकळा झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *