भोजाजी महाराज देवस्थानला लवकरच “ब’ दर्जा- ना. बावनकुळे

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम आजनसरा : संतनगरी आजनसरा येथे शुक्रवार २५ रोजी संत भोजाजी महाराज पुण्यतिथी सोहळा मोठ्या श्रद्धेने साजरा करण्यात आला. देवस्थान कमटीच अध्यक्ष डा. विजय पबत यानी सपत्नीक महाराजांच्या समाधीचे बह्ममहतावर विधिवत पजन करुण पुण्यतिथी सोहळ्याला प्रारंभ झाला. यावर्षीच्या सोहळ्याचे विशेष म्हणजे संतनगर आजनसर्याला लवकरच “ब’ दर्जा देण्याचे आश्वासन भोजाजी भतांसाठी पुण्यतिथीला दुग्धशर्करा योगच ठरला. कार्यक्रमाला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी खा. रामदास तडस, सुरेश वाघमारे, आ. समिर कुणावार, भाजपा जिल्हा अध्यक्ष सुनील गफाट, जिपचे माजी सभापती मिलिंद भेंडे, संस्थानचे अध्यक्ष डॉ. विजय पर्बत यांची विशेष उपस्थिती होती, यावेळी ना. बावनकुळे म्हणाले की, संत भोजाजी महाराज हे अलौकिक श्रद्धेचे स्थान आहे. यास्थळी मंत्री म्हणून नव्हे तर महाराजांचा भक्त म्हणून आलो आहे. या तीर्थ क्षेत्राला लवकरच ब दर्जा देऊन सर्वतोपरी विकास करण्यासाठी प्रयत्न करणार असून, अध्यक्ष डॉ. पर्बत यांच्या मागणीनुसार विकास आराखड्यानुसार निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे ना. बावनकुळे म्हणाले.

डॉ. पर्बत यांनी आयुष्य महाराजांच्या सेवेत समर्पित केले आहे. त्यासाठी आपण सदैव त्यांच्या पाठीशी आहे. येत्या ५ वर्षात मंदिराचा कायापालट होईल असा विश्वास ना. बावनकुळे यांनी दिला. महाराजांच्या समाधी दर्शनासाठी पहाटे पासूनच भाविकांची रीघ होती, काल्याचे कीर्तन आटोपल्यानंतर दुपारी १ वाजता पासुन महाप्रसादाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. संत भोजाजी महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्याची परंपरा देवाजी महाराजांनी १९५५ पासुन सुरु केली असुन आजही अखंड सुरू आहे. पुण्यतिथी सोहळ्यात, महाप्रसाद व दींडी स्पर्धा पाहण्यासाठी पंचक्रोशी सह इतर जिल्ह्यातन १ लाख भाविकांनी उपस्थिती लावली. दिंडीसोहळ्याच्या मार्गात सडा रांगोळी काढून गावकरी येणार्या भाविकाच स्वागत करीत हात. शुक्रवारी रात्री महाराजांची पालखी समाधी स्थळापासुन नगर परिक्रमा करण्यासाठी दिंड्या, भगव्या पताकाव भोजाजी नामाच्या जयघोषात वारकरी सम्प्रदायाची पताकाफडकावित अकरा घोड्यांचाताफा व १५ बँड पथकच्याउपस्थितीत पालखीचे रिंर्गन व दिंडीस्पर्धा घेऊन सकाळी ८ वाजता समाधीस्थळी पोहोचल्यानंतर दही फोडण्यात आली. यशस्वीतेसाठी देवस्थानचे सचिव शिवदासपर्बत, उपाध्यक्ष धनराज मेश्राम, राजेंद्र ढवळ, नामदेव गाढव,रमेश ठाकरे, रामाजी कोपरकर, विनोद आष्टनकर, शालिनीताईईखार,श्रावण काचोळे, महेशकोसूरकर यांच्यासह गावाकर्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *