मध्य पूर्वेतील युद्धात भारताचा ‘प्लॅन बी’ ठरतोय यशस्वी; पीएम नरेंद्र मोदींनी संसदेत केला उल्लेख
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम नवी दिल्ली : मध्य पूर्वेतील युद्ध अद्याप सुरू आहे. अमेरिकाइस्रायलविरुद्ध इराण संघर्षाचा २४ वा दिवस असून स्ट्रेट होमर्ुझमधील जल वाहतूक ठप्प झाल्याने जगात तेल, गॅस संकट वाढले आहे. जे देश ऊर्जा पुरवठ्यासाठी आयातीवर निर्भर आहेत त्यांना याचा जास्त फटका बसला आहे. मध्य पूर्वे तील तणावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर आज संसदेत पंतप्रधानांनी सरकार या संकटांना तोंड देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगत प्लॅन बीही सांगितला.
मध्य पूर्वेतील संघर्षावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, पश्चिम आशियातील परिस्थिती चिंताजनक आहे. कच्चे तेल, आवश्यक गॅसचा बहुतांश पुरवठा याच मार्गाने येतो. परंतु युद्धामुळे स्ट्रेट होमर्ुझमधून टँकर आणणेआव्हानात्मक बनले आहे. भारतातक्रूड, गॅसपासून खतांची आयातहीयाच देशातून होते. ङझॠ ची६० टक्के आयातही केली जाते. व्यावसायिक जहाजांवर हल्ला आणिहोर्मझमधील अडथळा मंजर नाही.सरकार या मागावरून भारतीयजहाजांना सुरक्षितपणे वाहतूककरण्यासाठी प्रयत्न करत आहे.तिथल्या प्रत्येक परिस्थितीवरनजर ठेवून आहोत. सरकार पूर्णत:सतर्क मोडला आहे असं त्यांनी सांगितले. तसच मध्य पवतील सकटाचाजागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे आणि भारत आखाती देशांमधील परिस्थितीवर बारकाईनेलक्ष ठेवून आहे. ऊर्जा हाअर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि ऊर्जेचा एक प्रमुख जागतिक स्रोत असलेला पश्चिम आशियासध्याच्या संकटामुळे प्रभावित झालाआहे. भारतावरील परिणाम कमी करण्यासाठी सरकार धोरणात्मक आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करत आहे. भारताची अर्थव्यवस्था मजबूत आहे असही पतप्रधान मादी यानी म्हटल.









