राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे

मुंबई/प्रतिनिधी गणेशात्सवानिमित्त आज “वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीसपत्नीक श्री गणरायाची विधिवत पूजा करुन प्रतिष्ठापना कलीयावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातीलजनतेला सुख समृद्धी मिळू दे अशीप्रार्थना केली. दरवर्षीप्रमाणे यंदाहीमुख्यमंत्र्यांच्या “वर्षा’ निवासस्थानीगणरायाच आगमन झाल. मख्यमत्रएकनाथ शिंदे, त्यांच्या पत्नी सौ. लता शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, स्नुषा सौ. वृषाली शिंदे, नातूकु. रुद्रांश यावेळी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातीलजनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, गणरायाचं आगमन झालंय. आपल्या आयुष्यात पण आनंद, समाधान, समृद्धी येवो, सर्वांना सुबुद्धी मिळो हीच प्रार्थना. प्रत्येक गणोशोत्सव एक नवी ऊर्जा, प्रेरणा आणि उत्साह घेऊन येतो. सगळीकडे मंगलमय आणि पवित्र वातावरण निर्माण होतं. गणेशोत्सवातून महाराष्ट्राच्या महान संस्कृतीचं दर्शन घडतं. सगळ्या जगाचं महाराष्ट्राकडे लक्ष लागलेले असते. या काळात महाराष्ट्राच्याच नाही तर देशात आणि विदेशातही मराठी माणसांत उत्साह-जोश दिसतो. हे शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे सरकार आहे.

यंदा राज्यात सगळीकडे खूप चांगला पाऊसही झाला आहे, त्यामुळं शेतकरी बांधवामध्येही उत्साह आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतीभातीचं नुकसान झालं आहे. या कालावधीत शेतकऱ्यांना धिर देण्यासाठी सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांना सर्वोतपरी मदत केली जाईल. माझं आपणास आवाहन आहे की, श्री गणेशाची मनोभावे सेवा करतानाच, आपण सामाजिक बांधिलकची जाणीव ठेवूया. गरजू लोकांपर्यंत पोहचा. त्यांना मदतीचा हात द्या. त्यांच्यापर्यंत शिक्षण, आरोग्य तसेच अशा विविध प्रकारच्या सेवा, मदत पोहचवण्याचा प्रयत्न करूया. आपण पर्यावरणाची काळजी घेणं पण गरजेचं आहे.

आपले सणवार हे निसर्गाला पूरक असे असतात. त्यामुळे निसर्गाचं जतन-संवर्धन होईल ही बाब लक्षात घेऊन सण साजरे करावेत असेही आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले. राज्य शासनाने अनेक चांगल्या लोककल्याणकारी योजना सुरु केल्या आहेत, देशपातळीवर त्याचं कौतुक होत आहे. शेतकरी, युवक, महिला या सर्वचस्तरातील घटकांचा विचार करून शासन सगळ्यांना सक्षम करण्यासाठी पाठबळ देत आहे. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना म्हणजे राज्यातल्या भगिनींच्या आयुष्यात क्रांतीआणणारी योजना ठरत आहे. या बहिणींचे आशीर्वादही आम्हाला मिळत आहेत. परदेशी गुंतवणूक राज्यात मोठ्या प्रमाणावर येतआहे. देशाच्या पाच ट्रिलियनडॉलर्स अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचा एक टिलियन डॉलसचा वाटाअसणार आहे. श्रीगणेशाच्या कृपेनं आम्हीराज्यातल्या गोरगरीब, दुर्बलआणि गरजू लोकांसाठी आणखीहीचांगल्या योजना आणून त्यांचीअंमलबजावणी करू असेही यावेळीमुख्यमंत्र्यांनी सांगितले.