दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान

मुंबई/प्रतिनिधी लोकसभा निवडणूक २०२४च्या दुसऱ्या टप्प्यातीलआज २६ एप्रिल रोजी १३राज्यांतील ८८ मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. या जागांचे निकालही एकत्रित ४ जूनला जाहीरकेले जातील. मतदान शांततेतआणि निष्पक्षपणे व्हावे यासाठी निवडणूक आयोगाने पूर्ण तयारी केली आहे. दुसरीकडे तिसऱ्या टप्प्यासाठीमतदानासाठी नाव मागे घेण्याची तारीख गेल्याने एकूण उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले आहे. तिसऱ्या टप्प्यासाठी ७ मेला १२ राज्येआणि केंद्र शासित प्रदेशांमधील ९५जागांसाठी मतदान होणार आहे.