बारावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल ९१.८८ टक्के; यंदाही मुलींनी मारली बाजी

यंदाही मुलींची बाजी, मुलांचा निकाल ५.०७ टक्यांनी कमी
बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला असून यंदाचा राज्याचा निकाल ९१.८८ टक्के लागला. यंदा बारावीच्या निकालात कोकण विभागानं बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल ९६.७४ टक्के लागला आहे. तर, सर्वात कमी लातूर विभागाचा लागला आहे. लातूर विभागाचा निकाल ८९.४६ टक्के लागला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, यंदाही बारावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. ९४.५८ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर मुलांच्या निकालाची टक्कवारी ८९.५१ टक्के आहे. मुलांपेक्षा मुलींचा निकाल ५.०७ टक्क्यांनी अधिक आहे.
यंदा निकालाचा टक्का घसरला
यंदा निकालाचा टक्का घसरला असून फेब्रुवारी मार्च २०२४ चा निकाल ९३.३७ टक्के लागला होता. तर, फेब्रुवारी मार्च २०२५ चा निकाल ९१.८८ टक्के लागला. त्यामुळे यंदा महाराष्ट्र बोर्डाच्या बारावी परीक्षेचा निकालाचा टक्का १.४९ नं घसरला आहे.
परीक्षेवेळी गैरप्रकार झाल्याचं आढळलेल्या १२४ परीक्षा केंद्रांची कसून चौकशी
बारावीची परीक्षा ज्या परीक्षा केंद्रांवर पार पडली, त्या एकूण ३३७३ परीक्षा केंद्रांपैकी १२४ परीक्षा केंद्रांची चौकशी होणार आहे. या परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार झाल्याचं आढळल्यामुळे या केंद्रांची चौकशी केली जाणार आहे. या चौकशी दरम्यान, केंद्रांची चौकशी करताना, केंद्रांवर परीक्षेवेळी झालेला गैरप्रकार सिद्ध झाल्यास किंवा त्रुटी आढळल्यास १२४ परीक्षा केंद्र बोर्ड कायमस्वरूपी बंद करणार आहे.
कॉपी प्रकरणात १२४ केंद्रांची चौकशी
गेल्या काही दिवसांपासून बारावीच्या परीक्षेवेळी कॉपी होण्याची प्रकरणं वाढली आहे. नव विभागीय मंडळात कॉपी प्रकरणी १२४ केंद्रांवर चौकशी करुन त्यानंतर कारवाई केली जाणार आहे. त्यात पुण्यातील ४५, नागपुरातील ३३, छत्रपती सभाजी नगरमधील २१४, मुंबईतील ९, कोल्हापुरातील ७, अमरावतीतील १७, नाशकातील १२, लातुरातील ३७ अशा एकूण ३७४ कॉपी झाल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.
बारावीच्या निकालाची ठळक वैशिष्ट्य
बारावीच्या परीक्षेला राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम व आय.टी.आय. या शाखांसाठी एकूण १४,२७,०८५ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४,१७,९६९ विद्यार्थी प्रविष्ट झाल असन त्यापैकी १३,०२,८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतेची टक्केवारी ९१.८८ आहे. खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या ३६,१३३ एवढी असून त्यापैकी ३५,६९७ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून २९,८९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८३.७३ आहे. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ४२,३८८ पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४२,०२४ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट अग्ले. त्यापैकी १५,८२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत आणि त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ३७.६५ आहे.
या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ७,३१० दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ७,२५८ दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी ६,७०५ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी १२.३८ आहे. बारावीच्या परीक्षेस नोंदणी केलेल्या पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रचलित पध्दतीने सवलतीचे गुण देणेबाबत कार्यवाही करण्यात आलेली आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्या कोकण विभागाचा निकाल (१९ सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा (८९.४६ टक्के) आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींची उत्तीणतची टक्कवारी ९४.५८ टक्क असन मलाच उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.५१% आहे. म्हणजेच मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ५.०७ टक्क्यांनी जास्त आहे. एकूण १५४ विषयांपैकी १७१०० टक्के आहे. दरम्यान, महाराष्ट्र बोर्डाची बारावीची परीक्षा राज्यभरात ११ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२५ या कालावधीत घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी राज्यभरातून एकूण १५,०५,०३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती. त्यापैकी मुलांची आकडेवारी ८,१०,३४८ होती, तर मुलींची आकडेवारी ६,९४,६५२ होती. तर, ३७ ट्रान्सजेंडर परीक्षेला बसले होते.