२२ नक्षलवाद्यांचा खात्मा; ३१ मार्च २०२६ पूर्वी भारत नक्षलमुक्त होणार, अमित शाहांची घोषणा

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या नक्षलवादविरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. गुरुवारी(२० मार्च २०२५) छत्तीसगडच्या विजापूरदंतेवाडा सीमेवर सुरक्षा दलांनी २२ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. चकमकीत एक जवानही शहीद झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या मोहिमेबद्दल माहिती दिली आण ३१ मार्च २०२६ पूर्वी देश नक्षलमुक्त होईल, असा विश्वासही व्यक्त केला.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ७ वाजल्यापासून छत्तीसगडच्या गांगलूर पीएस हद्दीजवळील विजापूर-दंतेवाडा सीमेवर सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू होती.दोन्ही बाजूंनी बेच्छूट गोळीबारझाला, ज्यात सरक्षा दलांनीचकमकीत २२ नक्षलवाद्यांचाखात्मा केला. चकमकीनंतर सुरक्षादलाने २२ नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रेजप्त केली. दुःखद बाब म्हणजे, याचकमकीत विजापूर डीआरजीचा १जवान शहीद झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *