वर्धा तहसील कार्यालयातील नायब तहसीलदाराचा “भोंगळ’ कारभार चव्हाट्यावर…
प्राप्त कागदपत्रानुसार अशा प्रकारचे वादग्रस्त फेरफार घेऊ नये असा निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर सुद्धा असे फेरफार कशाच्या भरोशावर होतात? हे कळायला मार्गच उरला नाही. महसूल कार्यालय अशाच तुगलकी कारभारामुळे बदनाम होत असून याकडे वरिष्ठांचे डोळे झाक तर सुरू नाही ना? अशी चर्चा जोरदार रंग धरू लागली आहे. नुकत्याच प्राप्त कागदपत्रानुसार एका प्रकरणात तलाठीयांच्याकडून कुठलाही अहवाल न घेता तसच महसल विभागात प्रकरण दाखल नकरता आदेश पारित केल्याचे दिसून येतआहे. याबाबत सविस्तर वृत्त “जनसंग्राम’लवकरच प्रकाशित करणारच. अशाया निगरगट्ट व कर्तव्यहीन तसेचमहसूल नियमांची पायमल्ली करणाऱ्या अधिकाऱ्यावर वरिष्ठ अधिकारी कारवाईकरतील का?याकडे सर्वांचे लक्ष लागलेआहे.साहेब…खोटे बोलताना निदानआपण केलेल्या चुकांची परिमार्जनकरताना जिभेला हाड आहे की नाही?याबाबत खमंग चर्चा महसूल विभागात होताना दिसत आहे. (क्रमश:)