योगी सरकारचं जबरदस्त पाऊल! माफियानं कब्जा केलेल्या जागेवर गरिबांसाठी बांधली घरे

लखनौ/प्रतिनिधी उत्तर प्रदेशात सध्या जे घडत आहे, जे यापूर्वी कधीच घडले नव्हते. एकेकाळी गरिबांच्या जमिनींवर माफिया कब्जा करत असत, मात्र योगी सरकारआल्यानंतर माफियांच्या जमिनी वगरिबांसाठी घरे बांधली जात आहेत. संगम नगरी प्रयागराजमध्ये माफियाअतिक अहमदच्या ताब्यातूनमोकळ्या झालेल्या जमिनीवरगरिबांसाठी फ्लॅट तयार करण्यात आले आहेत. आता लवकरच गरिबांनात्यांच्या स्वप्नातील घराच्या चाव्यामिळणार आहेत. यासाठी प्रयागराजविकास प्राधिकरण लवकरचतारखा जाहीर करू शकते. येत्या दोन दिवसांत या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. या घरांनापूर्णपणे भगवा रंग देण्यात आला आहे. सजावटीचे काम वेगाने पूर्ण झाले आहे.

१७३१ चौरस मीटर जमिनीवर फ्लॅट बांधले

या सदनिकांचे लॉटरीद्वारेटप करण्यात य ेणार आह े. पीडीएचे अधिकारी या घरांवर लक्षठेवून आहेत. लुकरगंज भागातमाफिया अतिक अहमदच्याताब्यातून मुक्त केलेल्या जमिनीवर गरिबांसाठी फ्लॅट बांधले जातआहेत. १७३१ चौरस मीटरजागेवर हे ७६ फ्लॅट तयार आहेत,जे लवकरच लॉटरीद्वारे गरिबांना देण्यात येणार आहेत.

६ हजारांहून अधिक लोकांनी अर्ज केले

माफियांच्या जमिनीवरबांधलेल्या सदनिका मिळविण्यासाठीझुंबड उडाली आहे. यासाठीप्रयागराज विकास प्राधिकरणात६ हजार ६० जणांनी ऑनलाइन केले होते. त्यासाठीड्युडामार्फत तपास करण्यात आलाअसून आता पात्र ठरलेल्यांचीलॉटरी काढण्यात येणार आहे.या ४ मजली इमारतीत पार्किंग, कम्युनिटी हॉल आणि सौर दिवे असतील. ही इमारत पूर्णपणे ग्रीन बिल्डिंग असेल. लाभार्थ्यांना६ लाखांना सदनिका मिळेल,ज्यामध्ये १.५ लाख भारतसरकारकडून आणि एक लाख राज्यसरकारकडून अनुदान म्हणून दिले जातील. योजनेतील निवड झालेल्यालाभार्थ्यांना साडेतीन लाख रुपये भरावे लागणार आहेत.

अतिकची ११६९ कोटींची मालमत्ता जप्त

योगी सरकार आल्यापासून अतिक अहमद याच्या मालमत्तेवरबुलडोझर चालवला जात होता. गेल्या २ वर्षात अतिक अहमदची बहुतांश बेकायदेशीर मालमत्ताएकतर जप्त करण्यात आली आहे किंवा त्यावर बुलडोझरचा वापर करण्यात आला आहे. प्रशासनाने काही दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, अतिक अहमद यांची ११६९ कोटी रुपयांचीमालमत्ता जप्त करण्यात आली आहे.यातील ४१७ कोटींची मालमत्ता प्रशासनाने ताब्यात घेतली असून, सुमारे ७५२ कोटींच्या मालमत्तेवर बुलडोझर चालवण्यात आलाआहे. लुकरगंजची ही जमीन या जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये होती,अतिक्रमण हटवल्यानंतर योगीसरकारने गरिबांसाठी सदनिकाबांधण्याचा निर्णय घेतला होता. आता फ्लॅट तयार आहेत.