दिलेला शब्द पुर्ण होत असल्याचे समाधान- आ. कुणावार

आर्वी/प्रतिनिधी केंद्रीय मार्ग निधी अंतर्गतपारडी नगाजी व टेंभा गावालाजोडणार्या ३५ कोटी रुपयेकिंमतीच्या मोठ्या पुलाच्या बांधकामांचे भूमिपूजन आ. समीर कुणावार यांच्या हस्ते झाले. गावकर्यांचा उत्साहपाहून आपण केलेल्याकामगिरीचे समाधान होतअसल्याचे प्रतिपादन आ.समीर कुणावार यांनी केले. याव ेळी जिल्हा महाम ंत्री किशोर दिघे, माजी सभापती माधव चंदनखेडे, गंगाधरकोल्हे, तालुकाध्यक्ष आकाशपोहाणे, जेष्ठ समाजसेवक तथाकंत्राटदार राजाभाऊ मॅडमवार,प्रफुल्ल बाडे, भाग्येश देशमुख उपस्थित होते.आ. कुणावार पुढे म्हणाले की, निवडून आल्यापासून अनेक अकल्पनीय कामे माझ्या हस्ते झाली. मात्र आपल्या स्वप्नातील हिंगणघाट येथील नदीवरील पूल व आता पारडी नगाजी ते भा या पूलाचे बांधकाम अमूल्य असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. कार्यक्रमाला विक्की राऊत, अलका पवार, पल्लवी कामडी , संजिवनी कांबळे, प्रवीण कलोडे, नितीन वाघ, धनराज वरभे, मिलिंद कोपुलवार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.