पेपरच्या बातम्या, बैठकीच्या तारखा आणि मिटिंगचे किस्से, फडणवीसांनी थेट पुरावे देऊन सांगितलं प्रकल्प कसे गेले!

मुंबई/प्रतिनिधी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गेल्या काही दिवसांपासून राज्याबाहेर जाणाऱ्या प्रकल्पांवरुन महाविकास आघाडीला प्रत्युत्तर दिलं आहे. अडीच वर्षाच्या महाविकास आघाडीच्या कारकिर्दीत भयानक घटना घडल्यानं कुणीही महाराष्ट्रात येण्यासाठी तयार नव्हतं, गुंतवणूक करायला तयार नव्हतं. महाराष्ट्रातील विस्कटलेली घडी जागेवर आणण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. गेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत २५ हजार कोटींच्या प्रस्ताव आमच्या सरकारनं मंजूर केले आहेत. महाराष्ट्रात येऊ घातलेली रिफायनरी, तीन लाख कोटींची गुंतवणूक तुम्ही परत पाठवून महाराष्ट्राचं आतोनात नुकसान केलं यांचं मला आश्चर्य वाटतं, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी मविआला ला लगावला. देवेंद्र फडणवीस यांनी सुभाष देसाई यांनी फॉक्सकॉन यांनी उद्धव ठाकरे यांच्या काळात म्हटलं होतं. पहिलं फेक नरेटिव्ह फॉक्सकॉनचा तयार करण्यात आला की आमचं सरकार आलं आणि फॉक्सकॉन गेला ते चुकीचं आहे, असं फडणवीस म्हणाले. २३ सप्टेंबर २०२१ रोजीच्या बातमीचा दाखला देत देवेंद्र फडणवीस यांनी टाटा एअरबस प्रकल्प उद्धव ठाकरेंच्या काळात गेल्याचं म्हटलं. आम्ही विरोधी पक्षात गेलो म्हणजे आपलं राज्य विसरत नाही. मला ज्यावेळी कळलं की गुजरातला जाण्याचा निर्णय टाटा एअरबस करतंय. टाटा आणि एअरबसचं बोलणं २०१६ ला झालं होतं. त्यानंतर मी टाटा कडे जाऊन मी तो प्रकल्प मिहान प्रकल्पात नागपूरला आणा,असं म्हटलं होतं. गुजरात देईल त्याच्यापेक्षा अधिक सुविधा देऊ, असं ओशासन दिलं होतं.

आमचं सरकार बदलल्यावर मी त्या प्रकल्पाच्या प्रमुखांना सागर बंगल्यावर बोलावलं तुम्ही गुजरातला जात असल्याबद्दल विचारलं. महाराष्ट्रातील वातावरण गुंतवणूक करण्यासंदर्भात नसल्याचं ते म्हणाले. महाविकास आघाडीचं सरकार असताना टाटा एअरबस हा प्रकल्प महाराष्ट्रातून गेला आहे. हा प्रकल्प नागपूरला कण्याचा निर्णय घेतल्यानं नतं रच्या सरकारन ं या प्रकल्पाबाबत जाणीवपूर्वक चालढकल केल्याचा माझा समज असल्याचं फडणवीस म्हणाले. टाटा एअरबसच्या प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्रकल्प गुजरातला जाणार असल्याचं सांगितल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. सॅफ्रन प्रकल्प देखील मार्च २०२१ मध्ये हैदराबादला गेल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. सत्तेत असताना एक पत्र लिहिलं नाही पण आता आकाडं ताडं व के ल ं जात असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.