विधानसभा निकालांचा महाराष्ट्रात परिणाम नाही, मविआ-इंडिया आघाडी मजबूत; काँग्रेसला विेशास

मुंबई/प्रतिनिधी विधानसभेतील चित्र लोकसभेला राहत नाही. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तिसगडमध्ये विजयी झाला होता. भाजपचा पराभव झाला होता, ते चित्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दिसले नाही, त्याप्रमाणे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही आजचे चित्र दिसणार नाही, त्यात बदल होईल. काँग्रेस पक्षाचा मोठा विजय होऊन केंद्रात सत्तेत येईल, असा विेशास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला. टिळक भवनमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी चार राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालावर प्रतिक्रिया दिली. भारतीय जनता पक्ष हिंदू-मुस्लीम या दोन धर्मात भांडणे लावून ध्रुवीकरणाचे राजकारण करत आहे. काही राज्यांमध्ये त्यांचा हा प्रयत्न यशस्वी झाला. काँग्रेस अशा पद्धतीचे राजकारण करत नाही, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.