राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा उत्साह, शातंतेत मतदान; विजयाचा गुलाल कोण उधळणार? आज मतमोजणी

मुंबई/प्रतिनिधी राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या नव्या कारभारींची निवड करण्यासाठी आज मतदान पार पडले. आरोप-प्रत्यारोपाच्या तुरळक घटना वगळता शांततेत मतदान पार पडले. काही ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुका या बिनविरोध पार पडल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यातही पवारांचे गाव असलेल्या काटेवाडी ग्रामपंचायतीसाठी आज मतदान झाले. अजित पवार गटाचे पॅनल आणि भाजपच्या पॅनलविरोधात थेट लढत आहे. सोमवारी ६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.