विधीमंडळात गाजला खड्ड्यांचा मुद्दा, विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक

मुंबई/प्रतिनिधी मुंबईकरांना सर्वात जास्त त्रास होणाऱ्या खड्ड्यांचा मुद्दा विधानसभेत देखील गाजला. समाजवादीचे पक्षाचे आमदार रईस शेख यांनी या मुद्द्याला सर्वात आधी हात घातला. यावेळी त्यांनी मुंबई-नाशिक महामार्गावर झालेल्या खड्ड्यांचा मुद्दा यावेळी विधानसभेत उपस्थित केला. यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, ‘हा भाग मुख्यमंत्र्यांचा आहे, दोन ते तीन आमदार याच भागातले आहे, एक मंत्री देखील याचा भागात आहेत, तरीही नागरिकांना या भागात प्रवास करताना बराच त्रास सहन करावा लागत आहे.’ त्यामुळे नागरिकांना होणाऱ्या या त्रासावर लवकरात लवकर तोडगा काढावा. दरम्यान त्यांनी यावेळी कळवा टोलनाक्याचा मुद्दा देखील सभागृहात उपस्थित केला आहे.