अवधेश राय हत्येप्रकरणी ३२ वर्षांनी न्याय, मुख्तार अन्सारीला आजीवन कारावास आणि एक लाखाचा दंड

वाराणसी/प्रतिनिधी गँगसटर मुख्तार अन्सारीला वाराणसीने एमपी-एमएलए कोर्टाने ३२ वर्षानंतर जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. गँगस्टर मुख्तार अन्सारीला अवधेश राय हत्याकांड प्रकरणी कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. तसेच एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. अवधेश राय हत्याकांड प्रकरणी वारणसीच्या एमपी एमएलए कोर्टाने सोमवारी दोषी ठरवले. त्यानंतर लंच ब्रेकनंतर मुख्य निकाल दिला आहे. कोर्टाने हत्याकांडातील दोषी मुख्तार अन्सारी जन्मठेप सुनावली आहे. आयपीसीच्या कलम ३०२ अंतर्गत मुख्तार अन्सारी यांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. गेल्या वर्षभरात मुख्तार अन्सारीला वेगवेगळ्या चार प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली आहे. परंतु अवधेश राय हत्याकांड प्रकरणी मुख्तार अन्सारीला सर्वात मोठी शिक्षा मिळाली आहे.

आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या हत्येप्रकरणी दोन साक्षीदारांनी कोर्टात आपली साक्ष नोंदवली. शिक्षा सुनावल्यानंतर अन्सारीने वयाचा विचार करता शिक्षा कमी करण्याची मागणी केली. अवधेश राय हत्याकांड प्रकरणी कोर्टाने गँगस्टर मुख्तार अन्सारीला दोषी ठरवत तब्बल ३२ वर्षांनी शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात मुख्तार अन्सारीसह पाच जण आरोपी आहेत. मुख्तार अन्सारी, भीम सिंह, कमलेश सिंह, राकेश माजी आमदार अब्दुल कलाम अशी आरोपींची नावे आहेत. दरम्यान या पाच आरोपींपैकी अब्दुलआणि कमलेश यांचा मृत्यू झाला आहे.

काय आहे प्रकरण?

अवधेश राय यांची ३ ऑगस्ट१९९१ साली करण्यात आली होतअवधेश राय आपला छोटा भाऊ काँग्रेस नेते अजय राय यांच्याघराबाहेर उभे होते. अचानक एकव्हॅन आली. व्हॅनमधील लोकखाली उतरले आणि त्यांनी गोळीबारकेला. काँग्रेस नेते अवधेश राय यांची हत्या वारणसीच्या चेतगंज पोलिस ठाण्याच्या परिसरात झाली.ज्यादिवशी हत्या करण्यात आली त्यादिवशी पाऊस होता. व्हॅनमधूनआलेल्या लोकांनी अवधेश राय यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतत्यांना उपचारासाठी जवळीलरुग्णालयात दाखल करण्यात आलपरंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.