सेलू येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमात १९२४ लाभार्थ्यांना लाभ

वर्धा/प्रतिनिधी सर्वसामान्य नागरिकांना एकाच ठिकाणी विविध प्रकारच्या शासकीय सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाच्यावतीने संपूर्ण राज्यभर शासन आपल्या दारी हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत सेलू येथे आयोजित शिबिरात एकाच दिवशी १ हजार ९२४ लाभार्थ्याना लाभ देण्यात आला. शिबिराचे उद्घाटन आ. डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला आ.डॉ. पंकज भोयर, तहसिलदार मह कृषी विभागाच्यावतीने यांत्रिक अवजारे, ेंद्र स ुयर् व ंशी यांच्यासह वविध शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. विभागांनी आपल्या कार्यालयाचे स्टॉल कार्यक्रमस्थळी लावले होते. नागरिकांना सेवा उपलब्ध करुन देण्यासोबतच विविध शासकीय योजनांची माहिती देखील यावेळी कर्मचाऱ्यांनी लाभार्थ्यांना दिली.

या शिबिरात संजय गांधी योजनेच्या १७० लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. ४२ लाभार्थ्याना राशनकार्ड तर १६८ लाभार्थ्यांना सेतू प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. मनरेगाचे ३२ लाभार्थी, प्रधानमंत्री आवास योजना १७ लाभार्थी, शबरी आवास योजना ७, रमाई आवास योजना ९, स्वच्छ भारत योजनेच्या १५ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला तर इतर १३२ दाखल्यांचे वाटप पंचायत समितीच्यावतीने करण्यात आले. ट्रॅक्टर, ठिंबक/तुषार सिंचनचा २४८लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला तर महिला व बाल विकास विभागाच्यावतीने माझी कन्याभाग्यश्री योजनेंतर्गत १० लाभार्थ्यांना मुदत ठेवीचे वाटप करण्यात आले.

भूमी अभिलेखविभागाच्यावतीने ४० लाभार्थ्यांना नगरभूमापन नक्कल, ३० लाभार्थ्यांना मोजणीची क प्रत तर ५५ लाभार्थ्यांना सनदचे वाटप करण्यात आले. आरोग्य विभागाच्यावतीने ५२ लाभार्थ्यांनाआयुष्यमान भारत गोल्डन कार्डचे वाटपकरण्यात आले. ३०२ रुग्णांची तपासणी, ७०रुग्णांची रक्तगट तपासणी, ४२ रुग्णांची रक्त तपासणी, २५८ रुग्णांची आरोग्य तपासणी, १५९ रुग्णांची बीपी व शुगर तपासणी तर ६६ कुष्ठरोग व क्षयरोगाची तपासणी करण्यातआली. शिबिरास संपुर्ण तालुक्यातील लाभार्थीमोठ्या संख्येने सहभागी झाले होते.