अहमदनगरमधील दंगलीवरून शरद पवारांचा हल्लाबोल

अहमदनगर/प्रतिनिधी अहमदनगरमध्ये काही शक्ती धर्माच्या नावाने अंतर वाढवून दंगली घडवत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. यावेळी त्यांनी कर्नाटकचं उदाहरण देत तेथेही त्या लोकांनी सत्तेचा वापर करून द्वेष पसरवल्याचा आरोप करत जनतेने त्यांना धडा शिकवल्याचं नमूद केलं आणि भाजपावर हल्लाबोल केला. तसेच कर्नाटकात होऊ शकतं, तर देशातील कोणत्याही राज्यात होईल यासाठी प्रयत्न करणं आपली जबाबदारी असल्याचं मत व्यक्त केलं. ते रविवारी (२१ मे) अहमदनगरमध्ये बोलत होते. शरद पवार म्हणाले, धर्माच्या नावाने अंतर वाढवलं जात आहे. हा नगर जिल्हा पुरोगामी जिल्हा म्हणून ओळखला जातो. अनेक ऐतिहासिक काम करणारे मान्यवर या जिल्ह्यात होऊन गेले.

याच नगर जिल्ह्यात शेवगावला दोन ते तीन दिवस बाजारपेठ बंद होती. शरद पवार पुढे म्हणाले, देशातील चित्र बदलत आहे. काल मी बंगळुरूमध्ये होतो. तिथं नवं सरकार आलं आहे. तिथं अनेक वर्ष काही लोकांचं राज्य होतं. त्या लोकांनी त्यांच्या सरकारच्या काळात माणसांमध्ये द्वेष पसरवण्याचं काम केलं. सर्व देशाला वाटत होतं की, कर्नाटकची निवडणूक सत्ताधारी भाजपा जिंकणार. मात्र काल शपथविधी झाला आणि सामान्य माणसाचं सरकार सत्तेत आलं. यावेळी एक लाखापेक्षा अधिक लोक शपथविधीला हजर होते. त्यापैकी ७० टक्के तरुण होते आणि सर्व जातीजमातीमधील होते. कर्नाटकात एक धनगर समाजाचा माणूस मुख्यमंत्री झाला.

तो कष्टकरी आहे आणि तेथील ला ेका ंच्या हिताची जपवण ूक करतो. अशा लहान जातीवर्गातील व्यक्तीने कर्नाटकात मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. हे घडलं कारण कष्टकरी लोकांची एकजुट होती. ती एकजुट कर्नाटकात होऊ शकते, तर देशाच्या इतर राज्यातही झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करण्याचा हा काळ आहे, असंही पवारांनी नमूद केलं.