काँग्रेसनं दहशतवादासमोर गुडघे टेकले, कर्नाटकात मोदींचा “द केरल स्टोरी’चा उल्लेख करत जोरदार हल्लाबोल

बेल्लारी/प्रतिनिधी कर्नाटकातील बेल्लारी येथे जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्या ंनी ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाचाही उल्लेख केला. केरल स्टोरी हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. मेहनती, हुशार आणि बुद्धीमान लोकांच्या सुंदर भूमीसाठी ओळखल्या जाणाऱ्या केरळमध्ये दहशतवादी कारस्थानांना कसं प्रोत्साहन दिलं जात आहे हे या चित्रपटात दाखवलं आहे, असं मोदी म्हणाले. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात अनेक खोटी आश्वासनं आहेत. काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे लॉकडाऊन आणि त ुष्टीकरणाचा गठ्ठा आहे. आता काँग्रेसची अवस्था इतकी वाईट झाली आहे की त्यांचे पाय थरथर कापत आहेतआणि म्हणूनच माझ्या जय बजरंग बलीबोलण्यावरही त्यांना आक्षेप आहे, असंमोदी म्हणाले.

आपल्या व्होटबँकसाठी काँग्रेसनं दहशतवादासमोर गुडघे टेकल्याचंपाहून मला आश्चर्य वाटलं. असापक्ष कधी कर्नाटकाच्या सीमेचंरक्षण करू शकेल? कर्नाटकालादेशातील पहिल्या क्रमांकाचं राज्यबनवण्यासाठी संरक्षण, कायदासुव्यवस्था आवश्यक आहे. कर्नाटकाचंदहशतवाद मुक्त राहणंही तितकंचआवश्यक आहे. दहशतवादाविरोधात भाजपची भूमिका कठोर राहिलीये.जेव्हा दहशतवादावर कारवाई होते,तेव्हा काँग्रेसला पोटदुखी होते, असंहीते म्हणाले.