शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून रेशीम शेतीकडे वळावे- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

वर्धा/प्रतिनिधी शेतकऱ्यांनी शेतीला उत्तम जोडधंदा म्हणून रेशीम शेतीकडे वळण्याची आवश्यकता आहे. या शेतीतून रेशीम का ेषाच े दरमहा उत्पन्न घेऊन शेतक-यांची आर्थिक उन्नती होऊ शकते, असे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले. सेलू तालुक्यातील घोराड येथील विवेक माहुरे यांच्या तुती लागवड व किटक संगोपन कामाला भेट देऊन शेतकयांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिका-यांसह रोहयोच्या उपजिल्हाधिकारी सुप्रिया डांगे, सेलू तहसिलदार महेंद्र सुर्यवंशी आदी उपस्थित होते. शेतकयांना मनरेगा अंतर्गत एक एकर तुती लागवड करुन रेशीम कोष उत्पादन करण्याकरीता प्रकल्पासाठी तुती लागवड संवर्धन व किटक संगोपनगृह बांधकाम करतांना मजूरी आणि साहित्यासाठी शासनाकडून लाभ देण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात अशा प्रकारचे प्रकल्प राबविण्यासाठी जिल्हा रेशीम कार्यालयांनी काम करावे, असे आवाहनही राहुल कर्डिले यांनी यावेळी केले.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल आहे. तसेच नवीन उद्योग सुरु करण्यासाठी इच्छुक शेतक-यांना किटक संगोपनगृह बांधकामासाठी कर्ज पुरवठा करण्यासाठी व्यवस्था करण्यात येईल. त्यामुळे शेतक-यांनी कमजोर आर्थिक स्थितीत निश्चयाने रेशीम उद्योग उभा करण्यासाठी हातभार लागेल त्यामुळे शेतक-यांनी उत्पन्न वाढीसाठी तुती लागवड करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. कर्डिले यांनी रेशीम उत्पादनाबाबत येणा-या अडचणी शेतक-यांकडून जाणून घेतल्या व मिळत असलेल्या उत्पन्नाबाबत समाधान व्यक्त केले. श्री.माहुरे यांची चालू वर्षातील सहावी बॅच आहे व सध्या स्थितीत २५० अंडिपुंज किटक संगोपण कार्य सुरु आहे. यामध्ये १ लाख रुपयाच्यावर उत्पन्न होण्याचे अपेक्षित