जिल्ह्यात यावर्षी उभ्या राहिल्या सहा रोपवाटीका

वर्धा/प्रतिनिधी राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत राज्यात पुण्यश्लोकअहिल्यादेवी होळकर खाजगीरोपवाटीका योजना राबविण्यातयेत आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातयावर्षी ६ नवीन रोपवाटीकाउभारण्यात आल्या आहे.रोपवाटीकाधारकांना १२ लाख२० हजार रुपयांचे अनुदान वितरीतकरण्यात आले. भाजीपाला पिकांची दर्जेदार वकिडरोग मुक्त रोपे निर्मिती करुन रोपांच्या उत्पन्न व उत्पादनात वाढ करणे, रोपवाटीकेतून स्थानिकशेतकऱ्यांना शेतीपुरक व्यवसायाचीसंधी उपलब्ध करुन देणे, पिकरचनेत बदल घडवून आणणे व नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे,शेतक-यांच े आथिर् क उत्पन्न व भाजीपाला उल्पन्नात वाढकरण्यासाठी ही योजना राबविण्यातयेत आहे. योजनेंतर्गत प्रत्येकतालुक्यात किमान एक रोपवाटीकाउभारणी केली जात आहे. या खाजगी रोपवाटीकायोजनेचा लाभ घेण्यासाठी पाण्याचीकायमची सोय असणे आवश्यक आहे.
यासाठी लाभार्थ्यांची निवड करतांना महिला कृषी पदवीधारकांना प्रथम प्राधान्य दिले जाते, महिला गट, महिला शेतकरी यांना द्वितीय प्राधान्य तर भाजीपाला उत्पादक अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी गट यांना तृतीय प्राधान्य देण्यात येते. शेतकऱ्यांना पुर्वसंमती मिळाल्यापासुन १५ दिवसांच्या आत काम सुरु करुन तीन महिन्याच्या आत पुर्ण करणे आवश्यक आहे. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात जिल्ह्यात सहा रोपवाटीका नव्याने तयार करण्यात आल्या आहे. या रोपवाटीकाधारकांना १२ लाख २० हजार रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत लाभ घेऊ इच्छिणारे शेतकरी जवळच्या सुविधा केंद्रावरुन महाडीबीटी पोर्टलच्या संकेतस्थळावर जाऊन स्वत:ची नोंदणी करु शकतात. यासाठी आधार क्रमांकाचे प्रमाणिकरण करणे बंधनकारक आहे. योजनेच्या लाभासाठी शेतक-यांना एकदाच नोंदणी प्रक्रिया करावी लागते.