यंदाचा उन्हाळा घामटा काढणार, मार्च ते मे महिन्यात अंगाची लाहीलाही होणार

मुंबई/प्रतिनिधी राज्यातील तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. मार्च ते मे महिन्या दरम्यान महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून जाहीर केली आहे. मागील काही वर्षात तापमानात होत असलेली वाढ चिंतेचा आणण्याचे प्रयत्न होत असताना महागाईत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. मार्च ते मे महिन्यात महाराष्ट्रात अंगाची लाहीलाही होणार आहे . राज्यातील तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता देखील वर्तवली आहे. उत्तर कोकणात उष्णतेच्या लाटेचा अनुभव येणार असून तापमान विषय ठरतेय. यंदाच्या फेब्रुवारी ४० अंशांपार जाण्याचा अंदाज आहे. महिन्यात पारा चाळीशी जवळ पोहोचलाय. फेब्रुवारी महिना हा गेल्या १४७ वर्षातला सर्वात उष्ण महिना ठरलाय. पुढील तीन महिने देखील असेच तापदायक राहतील असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवलाय. मार्च ते मे महिन्यांदरम्यानगुजरात ते पश्चिम बंगाल पट्ट्यात उष्णतेच्या लाटा थडकतील असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. ला निनानंतर वाढत चाललेला अल निनोचा प्रभाव पाहता २०२३ वर्ष सुद्धा उष्ण लहरींचे आणि अधिक तापमानवाढीचे राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाढत्या तापमानाचा फटका पिकांना देखील बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे महागाई दर नियंत्रणात मार्च महिन्यात उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मागच्या वर्षी विदर्भ, मराठवाड्यात अनेकदा उष्णतेच्या लाटा बघायला मिळाल्या. ज्यात अनेक शहरांमधील तापमान हे ४५ अंशांपार गेल्याचं चित्र होतं. उष्णतेच्या लाटा थेट जूनपर्यंत अनुभवायला मिळाल्या होत्या. ज्यात अधिक तापमान आणि उषाणतेच्या लाटा उन्हाळ्यातील १२० दिवसांपैकी ३० दिवस होत्या. हा गेल्या ५० वर्षातला विक्रम होता. त्यामुळे यंदा भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज खरा ठरल्यास उन्हाचे चटके अधिक प्रमाणात सहन करावे लागणार आहेत.