जगभरातील उद्योजकांचा महाराष्ट्रावर विश्वास गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हे “फेव्हरेट डेस्टिनेशन’- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई/प्रतिनिधी केंद्र आणि राज्य शासनसमन्वयाने काम करीत आहे. राज्यशासन उद्योग वाढीसाठी योग्यआणि सकारात्मक निर्णय घेत आहे.उद्योजकांना विश्वास प्राप्त झाल्यामुळेमहाराष्ट्र राज्यात गुंतवणूक वाढायलासुरूवात झाली आहे. परदेशातील गुंतवणूक आणण्यासाठी महाराष्ट्र हे”फेव्हरेट डेस्टिनेशन’ झाले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री ॲण्ड ग्रीकल्चर यांनीआयोजित केलेल्या महाराष्ट्रआंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनाच्याउद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी उद्योगमंत्रीउदय सामंत, स्टेट बँक ऑफ इंडियाचे उप व्यवस्थापकीय संचालक प्रवीण राघवेंद्र, करूणाकरशेट्टी, आशिष पेडणेकर आदीउपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनीसांगितले की, राज्यातील उद्योजकही राज्याची ताकद आहे. दावोस येथे झालेल्या गुंतवणूक परिषदेला उपस्थित असलेल्या जगभरातील अनेक उद्योजकांनी महाराष्ट्राच्या दालनाला भेट दिली. अनेकउद्योजकांनी राज्यात गुंतवणूक करण्यासाठी उत्सुकता दर्शवली.

या परिषदेत सुमारे एक लाख ३७ हजार कोटी रूपयांचे सामंजस्य करार झाले. केवळ सामंजस्य करार न करता त्याच्या अंमलबजावणीची कार्यवाही सुरू केलेली आहे. हे करार केवळ मुंबई, पुणे, नाशिक येथे नसून मराठवाडा, विदर्भाच्या दुर्गम भागाला प्रगतीकडे नेणारे आहेत.

जमीन वाटप आणि इतर सुविधांची पूर्तता विभागामार्फत केली जात आहे. देशाच्या सकल देशांतर्गत उत्पन्नात राज्याचा १५ टक्के वाटा आहे. औद्योगिक उत्पादनात २० टक्के आणि परकीय गुंतवणुकीत सुमारे ३० टक्के एवढा वाटा आहे. राज्यात १२ लाख सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग आहेत. त्यांच्या माध्यमातून ९४ लाख लोकांना रोजगार मिळत आहे. नव्या उद्योगांच्या माध्यमातून नव्याने सुमारे दीड लाख रोजगार तयार होणार आहेत.

कौशल्य विकास विभागातर्फे घेतल्या जाणाऱ्या मेळाव्यांच्या माध्यमातून रोजगार मिळत आहेत, विविध रखडलेल्या प्रकल्पांना चालना मिळत आहे. एकीकडे पायाभूत सुविधा प्रकल्पांचे भूमीपूजन होत आहे, त्याचबरोबर औद्योगिक गुंतवणुकीवर भर दिला जात आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

समृद्धी महामार्ग हा एक हरित आहे. याचा फायदा उद्योगांना होणारआहे. नॅशनल पोर्टस विकसितकरण्यासाठी “गती शक्ती ” हाकार्यक्रम राबविण्यात येत आहे. रेल्वेसाठी केंद्राने साडेतेरा हजारकोटी रूपये राज्याला दिले आहेत.सहकार क्षेत्रासाठी केंद्राने दहा हजारकोटी रूपयांचा दिलासा दिला आहे.प्रधानमंत्री यांचे पाच ट्रिलियन डॉलरअर्थव्यवस्थेचे स्वप्न आणि त्यात राज्याचा एक ट्रिलियन डॉलरचा सहभाग पूर्ण करण्यासाठी यापायाभूत सुविधांच्या उपलब्धतेसह मार्ग आहे.

या महामार्गामुळे आपल्या सारख्या उद्योजकांचा उद्योगाला चालना मिळणार आहे. लॉजिस्टिक पार्क, टेक्स्टाईल पार्क याठिकाणी गुंतवणूक करावी, यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकायर् कर ेल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्यभरात रस्त्या ंचे जाळे विकसित केले जात आहे. मिसिंग लिंक कमी करून अंतर कमी केले जात आहेत.

प्रवास वेगवान होत हातभार लागणार आहे. महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनाच्या माध्यमातून सूक्ष्म,लघु, मध्यम उद्योगांना एक चांगलेव्यासपीठ मिळते. जगभरातूनआलेल्या रिटेलर्स व मोठ्याउत्पादकांना इथे विक्रीची संधीमिळते. आर्थिक उलाढाल होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळते,असेही ते म्हणाले.