बीबीसीच्या कार्यालयावरील कारवाईनंतर काँग्रेस आक्रमक, मोदी सरकारवर केला गंभीर आरोप!

नवी दिल्ली/प्रतिनिधी बीबीसीच्या दिल्लीमधीलकार्यालयावर प्राप्तिकरविभागाचे अधिकारी धडकलेआहेत. प्राप्तिकर विभागाच्याअधिकाऱ्यांकडून येथेचौकशी केली जातआहे. यावेळी बीबीसीकार्यालयात काम करणाऱ्याकर्मचाऱ्यांचे मोबाईल फोनदेखीलबंद असल्याचे म्हटले जात आहे.दरम्यान बीबीसी कार्यालयावर करण्यात आलेल्या कारवाईनंतरकाँग्रेसने आक्रमक पवित्रा धारणक ेला आह े. ही अघा ेषित आणीबाणी असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. मोदी सरकारवर काँग्रेसची टीका बीबीसीच्या दिल्लीमधीलकार्यालयावर प्राप्तिकर विभागाचेअधिकारी दाखल झाले आहेत.त्यानंतर काँग्रेसने आक्रमकपवित्रा धारण केला आहे. अगोदरबीबीसीच्या माहितीपटावर बंदी घालण्यात आली. त्यानंतर आताबीबीसीवर प्राप्तिकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली आहे. ही तर अघोषित आणीबाणी आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे.
बीबीसीच्या माहितीपटामुळे देशात खळबळ बीबीसीने गुजरात दंगल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी भाष्य करणारा इंडिया- द मोदी क्वेश्चन हा माहितीपट प्रदर्शित केला आहे. या माहितीपटानंतर देशात एकच खळबळ उडाली. माहितीपटात मोदी तसेच भारताची नकारात्मक प्रतिमा उभी करण्याचाप्रयत्न करण्यात आला आहे, असा दावा केला जातआहे. याच कारणामुळे यामाहितीपटावर यूट्यूब तसेचट्वीटरवर बंदी घालण्यात आलीया बंदीला झुगारून जेएनयूदिल्ली तसेच अन्य विद्यापीठांत विद्यार्थ्यांनी या माहितीपटाचेविशेष प्रदर्शन आयोजितकरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेया विद्यापीठांत कायदा वसुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता.